हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे ११६ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत १२३० कोटी रुपयांचे नुकसान


शिमला: हिमाचल प्रदेशात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या महिनाभरात झालेल्या विविध घटनांमुळे ११६ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने दिली.


राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २० जून ते १८ जुलै या कालावधीत पावसाशी संबंधित आपत्ती आणि अपघातांमध्ये ११६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या एकूण मृतांपैकी ६८ जणांचा मृत्यू थेट पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला आहे. त्यामध्ये ३३ वेगवान पूर (Flash Floods), २२ ढगफुटी (Cloudburst), आणि १९ दरड कोसळणे (Landslides) यांचा समावेश आहे. फ्लॅश फ्लड्स आणि ढगफुटीमध्ये प्रत्येकी १४ जणांचा मृत्यू, बुडाल्यामुळे १२ जणांचे प्राण गेले, विजेचा धक्का बसून ५ जणांचा मृत्यू झाला, तर दरड कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय साप चावणे, तसेच इतर कारणांनी २२ मृत्यू झाले आहेत.


पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, घसरट चढ-उतार, दरड कोसळणे आणि कमी दृश्यता यामुळे राज्यात ४८ रस्ते अपघातांचे बळी गेले आहेत. सोलानमध्ये ८, कुल्लूमध्ये ७, चंबामध्ये ६ आणि शिमलामध्ये ४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिमाचलमधील मंडी, कांगडा, कुल्लू आणि लाहौल-स्पीती हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. मंडी आणि कांगडा येथे प्रत्येकी १६ जणांचा मृत्यू, तर कुल्लूमध्ये ७ जणांचे प्राण गेले आहेत.


मुसळधार पाऊस, भूस्खलन, महापूराच्या आपत्तीमुळे राज्यातील सार्वजनिक पायाभूत सुविधा, घरे, शेती, पशुधन आणि दळणवळण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण आर्थिक नुकसान १२३० कोटी रुपये इतके असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, होम गार्ड्स आणि स्थानिक प्रशासनामार्फत बचाव आणि पुनर्स्थापना कार्य सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अत्यावश्यक नसल्यास डोंगराळ भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच स्थानिक हवामान आणि आपत्ती विषयक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान