हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे ११६ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत १२३० कोटी रुपयांचे नुकसान


शिमला: हिमाचल प्रदेशात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या महिनाभरात झालेल्या विविध घटनांमुळे ११६ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने दिली.


राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २० जून ते १८ जुलै या कालावधीत पावसाशी संबंधित आपत्ती आणि अपघातांमध्ये ११६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या एकूण मृतांपैकी ६८ जणांचा मृत्यू थेट पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला आहे. त्यामध्ये ३३ वेगवान पूर (Flash Floods), २२ ढगफुटी (Cloudburst), आणि १९ दरड कोसळणे (Landslides) यांचा समावेश आहे. फ्लॅश फ्लड्स आणि ढगफुटीमध्ये प्रत्येकी १४ जणांचा मृत्यू, बुडाल्यामुळे १२ जणांचे प्राण गेले, विजेचा धक्का बसून ५ जणांचा मृत्यू झाला, तर दरड कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय साप चावणे, तसेच इतर कारणांनी २२ मृत्यू झाले आहेत.


पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, घसरट चढ-उतार, दरड कोसळणे आणि कमी दृश्यता यामुळे राज्यात ४८ रस्ते अपघातांचे बळी गेले आहेत. सोलानमध्ये ८, कुल्लूमध्ये ७, चंबामध्ये ६ आणि शिमलामध्ये ४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिमाचलमधील मंडी, कांगडा, कुल्लू आणि लाहौल-स्पीती हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. मंडी आणि कांगडा येथे प्रत्येकी १६ जणांचा मृत्यू, तर कुल्लूमध्ये ७ जणांचे प्राण गेले आहेत.


मुसळधार पाऊस, भूस्खलन, महापूराच्या आपत्तीमुळे राज्यातील सार्वजनिक पायाभूत सुविधा, घरे, शेती, पशुधन आणि दळणवळण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण आर्थिक नुकसान १२३० कोटी रुपये इतके असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, होम गार्ड्स आणि स्थानिक प्रशासनामार्फत बचाव आणि पुनर्स्थापना कार्य सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अत्यावश्यक नसल्यास डोंगराळ भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच स्थानिक हवामान आणि आपत्ती विषयक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या