हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे ११६ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत १२३० कोटी रुपयांचे नुकसान


शिमला: हिमाचल प्रदेशात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या महिनाभरात झालेल्या विविध घटनांमुळे ११६ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने दिली.


राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २० जून ते १८ जुलै या कालावधीत पावसाशी संबंधित आपत्ती आणि अपघातांमध्ये ११६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या एकूण मृतांपैकी ६८ जणांचा मृत्यू थेट पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला आहे. त्यामध्ये ३३ वेगवान पूर (Flash Floods), २२ ढगफुटी (Cloudburst), आणि १९ दरड कोसळणे (Landslides) यांचा समावेश आहे. फ्लॅश फ्लड्स आणि ढगफुटीमध्ये प्रत्येकी १४ जणांचा मृत्यू, बुडाल्यामुळे १२ जणांचे प्राण गेले, विजेचा धक्का बसून ५ जणांचा मृत्यू झाला, तर दरड कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय साप चावणे, तसेच इतर कारणांनी २२ मृत्यू झाले आहेत.


पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, घसरट चढ-उतार, दरड कोसळणे आणि कमी दृश्यता यामुळे राज्यात ४८ रस्ते अपघातांचे बळी गेले आहेत. सोलानमध्ये ८, कुल्लूमध्ये ७, चंबामध्ये ६ आणि शिमलामध्ये ४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिमाचलमधील मंडी, कांगडा, कुल्लू आणि लाहौल-स्पीती हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. मंडी आणि कांगडा येथे प्रत्येकी १६ जणांचा मृत्यू, तर कुल्लूमध्ये ७ जणांचे प्राण गेले आहेत.


मुसळधार पाऊस, भूस्खलन, महापूराच्या आपत्तीमुळे राज्यातील सार्वजनिक पायाभूत सुविधा, घरे, शेती, पशुधन आणि दळणवळण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण आर्थिक नुकसान १२३० कोटी रुपये इतके असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, होम गार्ड्स आणि स्थानिक प्रशासनामार्फत बचाव आणि पुनर्स्थापना कार्य सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अत्यावश्यक नसल्यास डोंगराळ भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच स्थानिक हवामान आणि आपत्ती विषयक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या