Devendra Fadanvis : "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... तरी मुंबई...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा झणझणीत इशारा

मुंबई : विरोधकांकडून सातत्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा मुद्दा मांडला जातो. याच मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत खडसावून सांगितले की, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. कुणाचा बाप आला, बापाचा बाप आला, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच राहील", अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.



अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. मुंबईच्या विकासाबद्दल त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "प्रत्येकवेळी वर्ष-दीड वर्षांनी आलेल्यांना मुंबई बदलेली पाहायला मिळतंय. अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती व्यथा कुणाच्या वाट्याला येऊ नये असा प्रयत्न आपण करतो. म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे, मुंबईवर. त्यांनी काय अनुभवलं', असे म्हणत देवेंद्र फडणवीस ती कविता वाचून दाखवली.




"याच कवितेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची नांदी केलेली आहे. ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की, ४ महिन्यांनंतर भाषणं सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे", असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.



मुंबई महाराष्ट्राचीच आणि हजारो पिढ्या राहील


फडणवीस पुढे म्हणाले की, "आताच सांगतो. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. कुणाचा बाप... बापाचा बाप... त्याचा बाप... त्याचा बाप... त्याचा आजोबा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे. मुंबई महाराष्ट्राचीच राहील आणि हजारो पिढ्या राहील. या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील", असे फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या