Devendra Fadanvis : "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... तरी मुंबई...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा झणझणीत इशारा

मुंबई : विरोधकांकडून सातत्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा मुद्दा मांडला जातो. याच मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत खडसावून सांगितले की, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. कुणाचा बाप आला, बापाचा बाप आला, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच राहील", अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.



अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. मुंबईच्या विकासाबद्दल त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "प्रत्येकवेळी वर्ष-दीड वर्षांनी आलेल्यांना मुंबई बदलेली पाहायला मिळतंय. अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती व्यथा कुणाच्या वाट्याला येऊ नये असा प्रयत्न आपण करतो. म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे, मुंबईवर. त्यांनी काय अनुभवलं', असे म्हणत देवेंद्र फडणवीस ती कविता वाचून दाखवली.




"याच कवितेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची नांदी केलेली आहे. ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की, ४ महिन्यांनंतर भाषणं सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे", असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.



मुंबई महाराष्ट्राचीच आणि हजारो पिढ्या राहील


फडणवीस पुढे म्हणाले की, "आताच सांगतो. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. कुणाचा बाप... बापाचा बाप... त्याचा बाप... त्याचा बाप... त्याचा आजोबा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे. मुंबई महाराष्ट्राचीच राहील आणि हजारो पिढ्या राहील. या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील", असे फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी