Devendra Fadanvis : "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... तरी मुंबई...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा झणझणीत इशारा

मुंबई : विरोधकांकडून सातत्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा मुद्दा मांडला जातो. याच मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत खडसावून सांगितले की, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. कुणाचा बाप आला, बापाचा बाप आला, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच राहील", अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.



अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. मुंबईच्या विकासाबद्दल त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "प्रत्येकवेळी वर्ष-दीड वर्षांनी आलेल्यांना मुंबई बदलेली पाहायला मिळतंय. अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती व्यथा कुणाच्या वाट्याला येऊ नये असा प्रयत्न आपण करतो. म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे, मुंबईवर. त्यांनी काय अनुभवलं', असे म्हणत देवेंद्र फडणवीस ती कविता वाचून दाखवली.




"याच कवितेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची नांदी केलेली आहे. ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की, ४ महिन्यांनंतर भाषणं सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे", असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.



मुंबई महाराष्ट्राचीच आणि हजारो पिढ्या राहील


फडणवीस पुढे म्हणाले की, "आताच सांगतो. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. कुणाचा बाप... बापाचा बाप... त्याचा बाप... त्याचा बाप... त्याचा आजोबा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे. मुंबई महाराष्ट्राचीच राहील आणि हजारो पिढ्या राहील. या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील", असे फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल