Vidhanbhavan : मध्यरात्री विधानभवनाबाहेर जोरदार राडा, आव्हाडांची आक्रमक भूमिका

मुंबई: विधानभवनात गुरूवारचा दिवस हा आमदार पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादामुळे चांगलाच गाजला. दिवसभर हाच मुद्दा सुरू होता. मात्र मध्यरात्रीही विधानभवनाच्या बाहेर पुन्हा एकदा मोठा राडा पाहायला मिळाला.


विधानभवनात गुरूवारी राडा झाल्यानंतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकल साठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचून बाहेर काढले.


 


जितेंद्र आव्हाड म्हणणं होतं की रात्री देशमुख यास सोडून देतो असं सांगितले होते पण अटक करत असल्याने अचानक विधानभवन येथे आंदोलन सुरू केले.  एकीकडे आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांनी नितीन देशमुखला बसवलेल्या कारसमोर आंदोलन करत असतानाच अचानक त्याला दुसऱ्या कारमध्ये बसवलं. या गोंधळादरम्यान आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते या दुसऱ्या गाडीसमोर आंदोलन करण्यासाठी उठले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आव्हाड दुसऱ्या गाडीच्या पुढील बाजूस आव्हाड यांनी स्वत:ला झोकून दिलं. आव्हाड ही कार इंचभरही हलू देणार नाही अशा भूमिकेत थेट कारच्या खाली घुसले.


Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,