निवडणुका जवळ येतील, तशी युतीबाबतची चर्चा - उद्धव ठाकरे

मुंबई :“सध्या राज आणि मी मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. त्यामुळे आत्ताच आम्ही एकच आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी युतीबाबतची चर्चा सुरू होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद बोलत होते

हिंदी सक्तीच्या विरोधात आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला पंधरा दिवस उलटले असले तरी ठाकरे बंधूंची औपचारिक राजकीय युती अद्याप जाहीर झालेली नाही. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेली मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी युती होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

इगतपुरी येथे मनसेच्या मेळाव्यात युतीबाबत राज ठाकरे काही बोलणार का, याची उत्सुकता होती. मात्र, त्यांनी याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत सूचक वक्तव्य केले आहे.यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आणखी बळावली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीविषयी स्पष्ट भूमिका मांडली. “मुख्यमंत्री असताना मी हिंदी सक्तीची अंमलबजावणी केली नव्हती. माशेलकर अहवाल सादर झाला, पण तो स्वीकारलेला नाही. कोणत्याही भाषेची सक्ती राज्यात लागू होऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टोला लगावला.


Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण