महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव बदललं; सांगलीतील इस्लामपूर आता ईश्वरपूर!

  77

सांगली : सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या गावाचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे आता इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर झाले आहे.


राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करावे ही हिंदुत्ववादी संघटना तसंच त्या शहरातील नागरिकांची सातत्यानं मागणी होती. ती मागणी सरकारनं मान्य केली आहे.


राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शहराचं नाव बदलण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आले. तसंच उस्मानबादचे नाव धाराशिव आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नावसुद्धा बदलण्यात आलं आहे. या बदलाचे स्वागत आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.


सदाभाऊ खोत म्हणाले की इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव करण्यात यावे अशी माहिती मागणी आम्ही केली होती. वाळवा तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा मागणी नाव बदलण्यासंदर्भात केली होती. त्यामुळे ईश्वरपूरच्या लोकांचे मी अभिनंदन करतो, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.


Comments
Add Comment

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई: मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे,

प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या आयटीआय विद्यार्थ्यांवर कडक कारवाई: मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई: आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे

धक्कादायक! २५८ खाजगी रुग्णालयांचे परवाने रद्द!

मुंबई : खाजगी आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहारांवर निर्णायक कारवाई करत, महाराष्ट्र सरकारने बॉम्बे नर्सिंग होम्स

मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र वाटप! विभाग उपायुक्तावर निलंबनाची कारवाई

बोगस प्रमाणपत्रांसंदर्भात आदिवासी विकास भवनात उपायुक्तांवर थेट निलंबनाची कारवाई मुंबई: पावसाळी अधिवेशनात

Devendra Fadanvis : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 'हरित वीज क्रांती': मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, १० हजार कोटींची बचत होणार!

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एक