महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव बदललं; सांगलीतील इस्लामपूर आता ईश्वरपूर!

सांगली : सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या गावाचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे आता इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर झाले आहे.


राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करावे ही हिंदुत्ववादी संघटना तसंच त्या शहरातील नागरिकांची सातत्यानं मागणी होती. ती मागणी सरकारनं मान्य केली आहे.


राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शहराचं नाव बदलण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आले. तसंच उस्मानबादचे नाव धाराशिव आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नावसुद्धा बदलण्यात आलं आहे. या बदलाचे स्वागत आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.


सदाभाऊ खोत म्हणाले की इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव करण्यात यावे अशी माहिती मागणी आम्ही केली होती. वाळवा तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा मागणी नाव बदलण्यासंदर्भात केली होती. त्यामुळे ईश्वरपूरच्या लोकांचे मी अभिनंदन करतो, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.


Comments
Add Comment

उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या