नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : खासगी वसतिगृहात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार १६ जुलै २०२५ रोजी घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव ज्ञानेश्वरी संजय क्षीरसागर असे आहे. ती अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी होती आणि सरकारवाडा परिसरातील तिबेटियन मार्केटजवळील गौरव पार्क इमारतीत असलेल्या मुलींच्या खाजगी वसतिगृहात राहत होती.


दोन महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वरी नीटच्या तयारीसाठी एका खासगी कोचिंग क्लासला उपस्थित राहण्यासाठी नाशिकला आली होती. ती ११ वीत विज्ञान विषय घेऊन शिकत होती. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ती दुपट्टा वापरून पंख्याला लटकलेली आढळली. अन्य विद्यार्थिनींनी आणि वसतिगृह मालक यांनी तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले, यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ज्ञानेश्वरीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे. आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; लोहगडावर सिया गोयलकडून पोलिसांनी केले सीन रिक्रिएशन

पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो