नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : खासगी वसतिगृहात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार १६ जुलै २०२५ रोजी घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव ज्ञानेश्वरी संजय क्षीरसागर असे आहे. ती अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी होती आणि सरकारवाडा परिसरातील तिबेटियन मार्केटजवळील गौरव पार्क इमारतीत असलेल्या मुलींच्या खाजगी वसतिगृहात राहत होती.


दोन महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वरी नीटच्या तयारीसाठी एका खासगी कोचिंग क्लासला उपस्थित राहण्यासाठी नाशिकला आली होती. ती ११ वीत विज्ञान विषय घेऊन शिकत होती. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ती दुपट्टा वापरून पंख्याला लटकलेली आढळली. अन्य विद्यार्थिनींनी आणि वसतिगृह मालक यांनी तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले, यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ज्ञानेश्वरीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे. आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी

Jalna Bribe Case : पार्टी सुरू व्हायच्या आधीच वाजले बारा! एसीबीने जालनाच्या तहसीलदारांच्या घरात टाकला छापा

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक

Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला 'त्या' घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली