नवी मुंबईत १८ तास पाणी पुरवठा बंद

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी १७०० मि.मी. व्यासाची पामबीच मार्गालगत असलेल्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर नेरुळ सेक्टर-४६, अक्षर बिल्डींगजवळ वारंवार गळती होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली असून, नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला दोन्ही बाजूस जोडणीचे काम शुक्रवार १८ जुलै रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवार १८ जुलै सकाळी १० वाजल्यापासून शनिवार १९ जुलै रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत १८ तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागामध्ये तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवार १८ जुलै रोजी संध्याकाळचा व शनिवार १९ जुलै रोजी सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, तसेच शनिवार १९ जुलै रोजी संध्याकाळी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे.


तरी, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Share Market Update : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वधारले

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर, आज

RBI Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला

एमपीसीच्या बैठकीत कोणताही बदल नाही मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2026-27 आर्थिक वर्षास

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत, आशियामध्येही सर्वत्र तेजीचा कल

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर आज जागतिक

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी