सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची मोखाड्यात मात्र विश्रांती

भात लावणीसाठी शेतात पाण्याची व्यवस्था करताना शेतकरी


भात, वरई पिकांची लागवड खोळंबली


मोखाडा : राज्यात सगळीकडे मुसळधार पडणारा पाऊसाने मोखाडा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. सकाळी व सायंकाळी दहा पंधरा मिनिटे तुरळक पाऊस पडत असून दुपारच्या वेळी तर आकाश निरभ्र होत असून उकाडा जाणवत आहे.


यामुळे तयार झालेल्या भात, वरई पिकांची लागवड खोळंबली आहे. दिवसभर मुसळधार पाऊस न पडता अधुनमधून अर्धा एक तास मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांने सुध्दा आपल्या शेतात भात, वरई या पिकांची लागवड करायला सुरुवात केली होती. परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून सकाळी एकदा दहा पंधरा मिनिटे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला की, दिवसभर पाऊस पडत नाही. आकाश पुर्णतः निरभ्र राहत आहे.


यामुळे शेतात लागवडीस तयार झालेल्या भात पीकाची लावणी मात्र खोळंबली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेजारील शेतातील पाणी आपल्या शेतात घमेले, बादलीच्या सहाय्याने आणून लागवड चालू ठेवली आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षी कामांवर येणाऱ्या मजूरांची मजुरी दोनशे पन्नास वरून तीनशे रुपयांवर गेल्याने भरीव शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती परवडेनासे झाली असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहे.


एरवी शेतकरी पुनर्वसु नक्षत्रात हळवी भाताची शेतात लागवड पूर्ण करून वरई पिकाची लागवड करायला घेतो. मात्र यंदा पाहिजे तसा पाऊस सुरूवातीला पडल्याने ऐन लागवडीच्या काळात मात्र पाऊसाने उघडीप दिली आहे. यामुळे अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हळवी भाताची लागवड केलेली नसून जोरदार पावसाची वाट बघत
असल्याचे चित्र तालुक्याच्या ग्रामीण
भागात दिसून येत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या