बेवड्याची कमाल! पुलावरून ७० फुट खाली कोसळला; लोक घाबरले, पण तो मात्र...

  92

अमरावती : अमरावती मधी वलगांव येथे नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने दारूच्या नशेत धुंद व्यक्ती ७० फूट खाली पडला. मात्र, नंतर या बेवड्याने सर्वांना चकित करणारा थरारक प्रकार घडवला. पुलावरून तब्बल ७० फुट खाली हा इसम कोसळला. तेथे उपस्थित नागरिकांनी धैर्य दाखवत त्याला खांद्यावर उचलून रस्त्यावर आणले. पण यानंतर घडलेल्या प्रकाराने सर्वांचे डोळे विस्फारले!


रस्त्यावर आणल्यानंतर हा इसम नशेत नागमोडी चालत स्वत:च्या पायाने गाडीकडे निघाला. असं की त्याला काहीच झालं नाही. उपस्थित लोकांनी या बेपर्वा वृत्तीवर संताप व्यक्त केला. पण तो नशेत तरर्र असल्याने काही पावलं चालताच पुन्हा जमिनीवर कोसळला.


यावेळी वलगांव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.सदर ईसम हा दुचाकीने अमरावतीहून परतवाडाकडे जात होता. नव्याने बांधलेल्या वलगांव येथील पुलाचा सुरूवातीला आणि शेवटी संरक्षक कठडे नसल्याने तोल जाऊन हा अपघात घडला.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी