Ashish Shelar : दत्ताजी नलावडे यांच्या शिवालयासाठी १ कोटीचा निधी मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी नलावडे यांच्या वरळी येथील "शिवालय" या लोक सेवाकेंद्राला १ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत केली. दत्ताजी नलावडे यांनी आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवालय नावाचे लोकसेवा केंद्र सुरु केले होते त्याची इमारत जिर्ण झाली असून त्याची डागडुजी व सेवासुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करीत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्याला गट नेते प्रविण दरेकर यांनी पाठींबा दिला. तर मुंबई महापालिकेतर्फे या इमारतीच्या दुरुस्तीचे काम होती घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. मात्र त्या व्यतिरिक्त अन्य सुविधांसाठी निधी द्या अशी मागणी सदस्यांनी सरकारकडे केली.



त्याला उत्तर देताना मंत्री एँड आशिष शेलार म्हणाले की, शिवसेना नेते दत्ताजी नलावडे हे नगरसेवक आणि महापौर देखील होते. इतकेच नाही तर संयुक्त महाराष्ट्र आणि गोवामुक्ती या दोन्ही चळवळींमध्ये दत्ताजी नलावडे यांचे योगदान मोठे आहे. कामगार, क्रिडा, साहित्य, कला या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. खरं म्हणजे त्यांनी बांधलेल्या शिवालयाला उतरती कळा लागणे हेच अशोभनिय आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मुंबईच्या अभिमानाचे स्थान असलेल्या दत्ताजी नलावडे यांच्या शिवालयाला १ कोटी निधी देण्याबाबत येईल, अशी घोषणा मंत्री शेलार यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला