Ashish Shelar : दत्ताजी नलावडे यांच्या शिवालयासाठी १ कोटीचा निधी मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी नलावडे यांच्या वरळी येथील "शिवालय" या लोक सेवाकेंद्राला १ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत केली. दत्ताजी नलावडे यांनी आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवालय नावाचे लोकसेवा केंद्र सुरु केले होते त्याची इमारत जिर्ण झाली असून त्याची डागडुजी व सेवासुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करीत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्याला गट नेते प्रविण दरेकर यांनी पाठींबा दिला. तर मुंबई महापालिकेतर्फे या इमारतीच्या दुरुस्तीचे काम होती घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. मात्र त्या व्यतिरिक्त अन्य सुविधांसाठी निधी द्या अशी मागणी सदस्यांनी सरकारकडे केली.



त्याला उत्तर देताना मंत्री एँड आशिष शेलार म्हणाले की, शिवसेना नेते दत्ताजी नलावडे हे नगरसेवक आणि महापौर देखील होते. इतकेच नाही तर संयुक्त महाराष्ट्र आणि गोवामुक्ती या दोन्ही चळवळींमध्ये दत्ताजी नलावडे यांचे योगदान मोठे आहे. कामगार, क्रिडा, साहित्य, कला या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. खरं म्हणजे त्यांनी बांधलेल्या शिवालयाला उतरती कळा लागणे हेच अशोभनिय आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मुंबईच्या अभिमानाचे स्थान असलेल्या दत्ताजी नलावडे यांच्या शिवालयाला १ कोटी निधी देण्याबाबत येईल, अशी घोषणा मंत्री शेलार यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर