विधानसभेत गाजला हनीट्रॅपचा मुद्दा, पटोलेंनी दाखवला पेनड्राईव्ह


मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. विधानसभेत गुरुवारी हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 'मुंबईत मंत्रालय, तसेच नाशिक आणि ठाणे जिल्हा ही हनीट्रॅपची केंद्र झाली आहेत. राज्यातील किमान ७२ महत्त्वाच्या व्यक्ती हनीट्रॅपला बळी पडल्या आहेत. राज्याशी संबंधित महत्त्वाची माहिती हनीट्रॅपमुळे आता चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. महाराष्ट्राची बदनामी होत आहे. या बाबत महाराष्ट्र शासनाचे मंत्री काही उत्तरही दे नाहीत' असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.


हनीट्रॅपमुळे राज्यातील गोपनीय शासकीय कागदपत्रे आणि माहिती चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. गोपनीय माहिती राज्याबाहेर गेली आहे. काही आयएसएस अधिकारी, मंत्री हे पण हनीट्रॅपला बळी पडल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवला. पेनड्राईव्ह दाखवून कोणाचे चरित्रहनन करायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रश्नावर सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे ? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला.


नानांच्या वक्तव्यावर राज्य शासनाने पावसाळी अधिवेशन संपण्याआधी निवेदन द्यावे, असे निर्देश विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. तर विधानसभाध्यक्षांच्या आदेशाचे पालन होईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्य शासनाने आरोप गांभीर्याने घेतले आहेत, असेही ते म्हणाले.


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतरही शिउबाठाचे आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, “गुरुवारी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसमोर जाहीर विधान केले आहे की, नाशिकच्या आणि ठाण्याच्या माणसानेसुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली. सेटलमेंट करून प्रकरण मिटवले आहे. तर आता उपमुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेऊ. हे सरकार सभागृहाचे आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे का?” असा गंभीर आरोप केला. यावर स्पष्टीकरण देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी ज्या प्रकरणाची माहिती दिली ते वेगळे प्रकरण आहे. ती तक्रार हनीट्रॅपची नव्हती.” यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. भास्कर जाधव यांनी आमच्याकडे नावे असल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.


Comments
Add Comment

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या