विधानसभेत गाजला हनीट्रॅपचा मुद्दा, पटोलेंनी दाखवला पेनड्राईव्ह


मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. विधानसभेत गुरुवारी हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 'मुंबईत मंत्रालय, तसेच नाशिक आणि ठाणे जिल्हा ही हनीट्रॅपची केंद्र झाली आहेत. राज्यातील किमान ७२ महत्त्वाच्या व्यक्ती हनीट्रॅपला बळी पडल्या आहेत. राज्याशी संबंधित महत्त्वाची माहिती हनीट्रॅपमुळे आता चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. महाराष्ट्राची बदनामी होत आहे. या बाबत महाराष्ट्र शासनाचे मंत्री काही उत्तरही दे नाहीत' असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.


हनीट्रॅपमुळे राज्यातील गोपनीय शासकीय कागदपत्रे आणि माहिती चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. गोपनीय माहिती राज्याबाहेर गेली आहे. काही आयएसएस अधिकारी, मंत्री हे पण हनीट्रॅपला बळी पडल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवला. पेनड्राईव्ह दाखवून कोणाचे चरित्रहनन करायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रश्नावर सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे ? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला.


नानांच्या वक्तव्यावर राज्य शासनाने पावसाळी अधिवेशन संपण्याआधी निवेदन द्यावे, असे निर्देश विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. तर विधानसभाध्यक्षांच्या आदेशाचे पालन होईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्य शासनाने आरोप गांभीर्याने घेतले आहेत, असेही ते म्हणाले.


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतरही शिउबाठाचे आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, “गुरुवारी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसमोर जाहीर विधान केले आहे की, नाशिकच्या आणि ठाण्याच्या माणसानेसुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली. सेटलमेंट करून प्रकरण मिटवले आहे. तर आता उपमुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेऊ. हे सरकार सभागृहाचे आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे का?” असा गंभीर आरोप केला. यावर स्पष्टीकरण देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी ज्या प्रकरणाची माहिती दिली ते वेगळे प्रकरण आहे. ती तक्रार हनीट्रॅपची नव्हती.” यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. भास्कर जाधव यांनी आमच्याकडे नावे असल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.


Comments
Add Comment

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

२०३० पर्यंत पुनर्विकास प्रकल्प बदलणार मुंबईचे स्कायलाईन

उपनगरीय कॉरिडॉर ठरणार मुंबईच्या पुनर्विकास कहाणीचे प्रमुख केंद्र  मुंबईचा गृहनिर्माण बाजार मोठ्या बदलाच्या

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

Ask Private Limited व Hurun India अहवालातून गेमिंग कंपन्या बाहेर तर Zerodha नंबर १

मोहित सोमण: एएसके प्रायव्हेट लिमिटेड (Ask Private Limited) व हुरून इंडिया (Hurun India Limited) ने आपला पाचवा Ask Private Wealth Hurun India Unicorn and Future Unicorn 2025 अहवाल

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम