विधानसभेत गाजला हनीट्रॅपचा मुद्दा, पटोलेंनी दाखवला पेनड्राईव्ह


मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. विधानसभेत गुरुवारी हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 'मुंबईत मंत्रालय, तसेच नाशिक आणि ठाणे जिल्हा ही हनीट्रॅपची केंद्र झाली आहेत. राज्यातील किमान ७२ महत्त्वाच्या व्यक्ती हनीट्रॅपला बळी पडल्या आहेत. राज्याशी संबंधित महत्त्वाची माहिती हनीट्रॅपमुळे आता चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. महाराष्ट्राची बदनामी होत आहे. या बाबत महाराष्ट्र शासनाचे मंत्री काही उत्तरही दे नाहीत' असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.


हनीट्रॅपमुळे राज्यातील गोपनीय शासकीय कागदपत्रे आणि माहिती चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. गोपनीय माहिती राज्याबाहेर गेली आहे. काही आयएसएस अधिकारी, मंत्री हे पण हनीट्रॅपला बळी पडल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवला. पेनड्राईव्ह दाखवून कोणाचे चरित्रहनन करायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रश्नावर सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे ? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला.


नानांच्या वक्तव्यावर राज्य शासनाने पावसाळी अधिवेशन संपण्याआधी निवेदन द्यावे, असे निर्देश विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. तर विधानसभाध्यक्षांच्या आदेशाचे पालन होईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्य शासनाने आरोप गांभीर्याने घेतले आहेत, असेही ते म्हणाले.


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतरही शिउबाठाचे आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, “गुरुवारी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसमोर जाहीर विधान केले आहे की, नाशिकच्या आणि ठाण्याच्या माणसानेसुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली. सेटलमेंट करून प्रकरण मिटवले आहे. तर आता उपमुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेऊ. हे सरकार सभागृहाचे आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे का?” असा गंभीर आरोप केला. यावर स्पष्टीकरण देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी ज्या प्रकरणाची माहिती दिली ते वेगळे प्रकरण आहे. ती तक्रार हनीट्रॅपची नव्हती.” यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. भास्कर जाधव यांनी आमच्याकडे नावे असल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.


Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय