UAPA कायद्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने UAPA कायद्याविरोधात दाखल केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, “UAPA कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेखाली अटक करून व्यक्तींवर गुन्हेगारी कारवाई केली जाते. राज्यघटनेनुसार केवळ संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि देशाची सुरक्षा या तीन मुद्द्यांवरच प्रतिबंधात्मक अटक केली जाऊ शकते. परंतु UAPA कायदा या तत्त्वांचे उल्लंघन करून व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचा छळ करतो, म्हणूनच आम्ही या कायद्याला आव्हान दिले होते.” त्यांनी स्पष्ट केले की, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका कोणत्या मुद्द्यांवर फेटाळली हे आम्ही तपासून पाहणार आहोत व या विरोधात सर्वोच्च न्यायालयात लढा देणार आहोत.
Comments
Add Comment

‘दसरा मेळाव्याबाबत विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा’

मुंबई : सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते.

राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार, रोजगार इच्छुक तरुणांना संधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार

12th Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी...

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे बारावी परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मुंबई : राज्यात होत असलेली

मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड

ट्रेनची टक्कर थांबवणार! 'कवच' प्रणालीमुळे आता अपघात टळणार का? मध्य रेल्वेने केला मोठा दावा

मध्य रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा: मुंबई विभागात 'कवच' प्रणालीची यशस्वी चाचणी! सर्व ५ विभागांमध्ये 'कवच' लोको चाचण्या

ठाण्यात आज ऑरेंज, तर उद्या यलो अलर्ट

जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या