विजय वडेट्टीवारांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस ?


मुंबई : विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर झाले त्यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार सभागृहात नव्हते. या गैरहजेरीप्रकरणी वडेट्टीवारांना काँग्रेस हायकमांडने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. पण मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे वडेट्टीवारांनी विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींश बोलताना सांगितले.


सभागृहात असतो तर विधेयकाचे कागद तिथेच फाडून टाकले असते असे विजय वडेट्टीवार म्हणाले. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. उद्योगपतींविरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. ही आंदोलनं दडपण्यासाठीच सरकारने जनसुरक्षा विधेयक सादर केल्याचा आरोप त्यांनी केला.


जनसुरक्षा विधेयकावर १२ हजार आक्षेप आले होते. या संदर्भात विरोधकांनी लेखी स्वरुपात त्यांचे मत मांडले होते. पण सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर दोन्ही सभागृहात विरोधकांचा आवाज दाबून टाकला, असेही वडेट्टीवार म्हणाले. मी सभागृहात नाही हे बघूनच सरकारने विधेयक सभागृहात आणले आणि मंजूर करुन घेतले, असेही वडेट्टीवार म्हणाले.


Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही आता 'स्वीकृत सदस्य'

मुंबई : महापालिका, नगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्यां'च्या नियुक्तीचा

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री नुकसानभरपाई जाहीर करणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री

धर्मांतर विरोधी विधेयकात घुमला २००४ चा आवाज, डॉ. नीलम गोऱ्हेंनी सभागृहात जागवल्या जुन्या आठवणी

मुंबई: महाराष्ट्रात प्रलोभन किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या समस्येला आळा घालण्यासाठी आज विधान परिषदेत

धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा