चहाडे-तांदुळवाडी रस्त्याची चाळण

ठेकेदाराच्या राजकारणामुळे लाखोंचा निधी परत जाण्याची शक्यता


सफाळे  :पालघर जिल्ह्यातील चहाडे-तांदुळवाडी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढून ते काम वाडा येथील एका ठेकेदारांना दिले. मात्र पालघरच्या युनियन ठेकेदाराने हे काम बंद पाडले. त्यामुळे ठेकेदारांच्या राजकारणामुळे रस्ता दुरुस्तीचा लाखोंचा निधी परत जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.


चहाडे-तांदूळवाडी रस्ता पाऊस पडताच खड्ड्यात गेला असून या खड्डयांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताच्या घटना सतत घडत असतात. चहाडे- तांदुळवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ३० लाखाचा निधी देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मिळाली. या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर सुद्धा काढले होते. हे टेंडर वाड्यातील एका ठेकेदारांना दिले. मात्र पालघरच्या युनियन ठेकेदाराने हे काम बंद पाडले. त्यामुळे हे काम वेळीच पूर्ण झालेच नाही परिणामी रस्त्याची अक्षरशः चाळण होत चालली आहे. तर काम होत नसल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रस्त्यावरून दिवसभरात हजारो प्रवाशी प्रवास करत असतात.


त्या मध्ये गरोदर महिला, वयोवृद्ध , शाळेचे विद्यार्थी तसेंच अनेक कामगार यांच्या जीवाशी हा खेळ सुरु आहे. या रस्त्यावर रोज अपघात होत असतात. कोणाचे प्राण गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का ? असे लोक दपक्या आवाजात बोलत आहेत. हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर प्रशासनाने सोडवला नाही तर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा संतप्त सुरात इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका