चहाडे-तांदुळवाडी रस्त्याची चाळण

ठेकेदाराच्या राजकारणामुळे लाखोंचा निधी परत जाण्याची शक्यता


सफाळे  :पालघर जिल्ह्यातील चहाडे-तांदुळवाडी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढून ते काम वाडा येथील एका ठेकेदारांना दिले. मात्र पालघरच्या युनियन ठेकेदाराने हे काम बंद पाडले. त्यामुळे ठेकेदारांच्या राजकारणामुळे रस्ता दुरुस्तीचा लाखोंचा निधी परत जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.


चहाडे-तांदूळवाडी रस्ता पाऊस पडताच खड्ड्यात गेला असून या खड्डयांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताच्या घटना सतत घडत असतात. चहाडे- तांदुळवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ३० लाखाचा निधी देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मिळाली. या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर सुद्धा काढले होते. हे टेंडर वाड्यातील एका ठेकेदारांना दिले. मात्र पालघरच्या युनियन ठेकेदाराने हे काम बंद पाडले. त्यामुळे हे काम वेळीच पूर्ण झालेच नाही परिणामी रस्त्याची अक्षरशः चाळण होत चालली आहे. तर काम होत नसल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रस्त्यावरून दिवसभरात हजारो प्रवाशी प्रवास करत असतात.


त्या मध्ये गरोदर महिला, वयोवृद्ध , शाळेचे विद्यार्थी तसेंच अनेक कामगार यांच्या जीवाशी हा खेळ सुरु आहे. या रस्त्यावर रोज अपघात होत असतात. कोणाचे प्राण गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का ? असे लोक दपक्या आवाजात बोलत आहेत. हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर प्रशासनाने सोडवला नाही तर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा संतप्त सुरात इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

बोईसरकरांच्या प्रतिसादाने पास्थळचे ‘आंबटगोड’ मैदान दुमदुमले

‘दैनिक प्रहार’ पुरस्कृत पास्थळ महोत्सव २०२५ पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

६२१ कोटी खर्चूनही मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांतच!

व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट कामामुळे वाहतूक कोंडी वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी

कृषी उत्पादनांना परदेशातून वाढती मागणी

फळबाग नोंदणी व दर्जा तपासणी अनिवार्य वाडा : भारतीय गहू, तांदूळ, फळे, भाजीपाला तसेच इतर कृषी उत्पादनांना परदेशातून

तारापूर अणुऊर्जा केंद्र परिसरात ड्रोनसह हवाई साधनांवर निर्बंध

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसर व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने

हिरवी मिरची घेणार की, ढोबळी मिरची?

निवडणूक चिन्हांमध्ये २३ खाद्यपदार्थांचा समावेश गणेश पाटील विरार : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अपक्ष

पास्थळ महोत्सव २०२५

'जाणता राजा फाऊंडेशन'चा २७-२८ डिसेंबरला महोत्सव पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि