Yogesh Kadam : अनधिकृत कत्तलखान्यांवर लवकरच हातोडा पडणार!

१२ गुन्हे दाखल असल्याने आरोपीला तडीपार करण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश


मुंबई : बदलापूर पश्चिम येथील दर्गा मोहल्ला परिसरात दिनांक ९ जून २०२५ रोजी, पोलिसांनी धाड टाकून ५१० किलो गोमांस आणि एक जिवंत वासरू जप्त केले. या ठिकाणी अनधिकृतपणे जनावरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले असून, याप्रकरणी कैफ नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या आरोपीविरोधात यापूर्वी अशाच स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल असून, सदर आरोपी सध्या अटकेत आहे. या गुन्ह्याबाबत कायद्यात ५ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. आगामी अधिवेशना पर्यंत ह्या कायद्यात उचित सुधारणा करून जे सराईत गुन्हेगार असतील त्यांना १० वर्षांची शिक्षा व दंडाची कारवाई होईल अशी तरतूद करण्याची घोषणा सभागृहात केली.



विधानसभेत आज आमदार संजय उपाध्याय यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. दिनांक ९ जून २०२५ रोजी, बदलापूर (पश्चिम) येथे जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले. त्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, अशा घटना रोखण्यासाठी राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यां विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. राज्यात कोणी अनधिकृतपणे कत्तलखाने चालवत असल्यास, त्याबाबतची माहिती विशेष मोहिमेअंतर्गत गोळा करून कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलीस आणि संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


तसेच, अशा गंभीर घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि जनतेच्या धार्मिक भावना लक्षात घेता, शासन सद्याच्या कायद्यात सुधारणा करून कठोर शिक्षा लागू करण्याचा विचार करीत आहे. तसेच गोरक्षणाचे काम करत असलेल्या संस्था आणि पोलिस विभागांचा समन्वय राखण्यात येईल असेही मंत्री श्री. कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता