Yogesh Kadam : अनधिकृत कत्तलखान्यांवर लवकरच हातोडा पडणार!

१२ गुन्हे दाखल असल्याने आरोपीला तडीपार करण्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश


मुंबई : बदलापूर पश्चिम येथील दर्गा मोहल्ला परिसरात दिनांक ९ जून २०२५ रोजी, पोलिसांनी धाड टाकून ५१० किलो गोमांस आणि एक जिवंत वासरू जप्त केले. या ठिकाणी अनधिकृतपणे जनावरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले असून, याप्रकरणी कैफ नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या आरोपीविरोधात यापूर्वी अशाच स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल असून, सदर आरोपी सध्या अटकेत आहे. या गुन्ह्याबाबत कायद्यात ५ वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. आगामी अधिवेशना पर्यंत ह्या कायद्यात उचित सुधारणा करून जे सराईत गुन्हेगार असतील त्यांना १० वर्षांची शिक्षा व दंडाची कारवाई होईल अशी तरतूद करण्याची घोषणा सभागृहात केली.



विधानसभेत आज आमदार संजय उपाध्याय यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. दिनांक ९ जून २०२५ रोजी, बदलापूर (पश्चिम) येथे जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले. त्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, अशा घटना रोखण्यासाठी राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यां विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. राज्यात कोणी अनधिकृतपणे कत्तलखाने चालवत असल्यास, त्याबाबतची माहिती विशेष मोहिमेअंतर्गत गोळा करून कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलीस आणि संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


तसेच, अशा गंभीर घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि जनतेच्या धार्मिक भावना लक्षात घेता, शासन सद्याच्या कायद्यात सुधारणा करून कठोर शिक्षा लागू करण्याचा विचार करीत आहे. तसेच गोरक्षणाचे काम करत असलेल्या संस्था आणि पोलिस विभागांचा समन्वय राखण्यात येईल असेही मंत्री श्री. कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून