परवानगीशिवाय खाणकाम करणाऱ्याला भुर्दंड

  50

रॉयल्टी न भरल्याने १९० कोटी ३० लाख रुपयांचा दंड


बदलापूर : बदलापूरजवळ असलेल्या चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावांत इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये दगडखाण सुरू होती. या खाणीमुळे भूस्खलन होऊन दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखेर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने या दगडखाणीच्या मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने १९० कोटींचा दंड ठोठावला आहे. राज्यातील दगड खाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.


सदर दगड खाणीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे ही दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा बंद होत नव्हती. दरम्यान वनशक्ती या सामाजिक संस्थेने कार्यकर्ते नंदकुमार पवार आणि कोपऱ्याची वाडीतील स्थानिक रहिवासी भास्कर वारघडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात एकत्र लढा दिला. या संदर्भात गावकऱ्यांसोबत वनशक्तीचे कार्यकर्ते नंदकुमार पवार आणि कोपऱ्याची स्थानिक रहिवासी भास्कर वारघडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात एकत्र लढा दिला होता, अखेर या दगडखाण मालकाला परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत १ लाख ३० हजार ब्रास दगड खाणीचे उत्खनन केल्याने आणि त्याची रॉयल्टी न भरल्याने १९० कोटी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीने अंमलबजावणी करावी असे आदेश सुद्धा उच्च न्यायालयाने दिले आहेत.


त्यामुळे आता ही दगडखाण बंद होणार असल्याने गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. ही दगडखाण बंद होणार असल्याने आमच्या आरोग्यावर होत असलेली हानी थांबणार असल्याचे भास्कर वारघडा यांनी सांगितले. तसेच गावकऱ्यांनी या निर्णयासंदर्भात समाधान मानले आहे.




ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जमीनही नापीक झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे झरेही बंद झाले होते. त्यामुळे या विरोधात वनशक्तीच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या दंडावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत सक्तीने वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना होणारा त्रास बंद होणार असून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी याबाबत तातडीने कारवाई करावी.
- नंदकुमार पवार, याचिकाकर्ते आणि वनशक्तीचे सदस्य


Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या