Eknath Shinde: विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सहकार्य करणार

'सितारे जमीन पर' सिनेमाच्या स्पेशल शोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती


मुंबई: विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर काही निर्णय घ्यावा लागला तर तोही नक्की घेऊ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आमिर खान निर्मित 'सितारे जमीन पर' या सिनेमाचा विशेष खेळ आज आयनॉक्स सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.



अभिनेता आणि निर्माता आमिर खान दिग्दर्शक पी एस प्रसन्ना यांचे केले कौतुक


यावेळी बोलताना त्यांनी, विशेष मुलांच्या आयुष्यावर आधारित 'सितारे जमीन पर' हा सिनेमा तयार केला असून, त्यातून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला आहे. विशेष मुलांना देखील सर्वसामान्य मुलांसोबत त्याच शाळेत शिकता यावं याबाबत या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. विशेष मुले ही इतर मुलांच्या तुलनेत अजिबात वेगळी नसून त्यांनाही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य शाळेत शिकण्याचा तेवढाच अधिकार असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, अभिनेता आणि निर्माता आमिर खानसह दिग्दर्शक पी. एस. प्रसन्ना यांनाही हा विषय हाती घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच हा अवघड विषय तितक्याच तरलतेने मांडल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी हा शो आयोजित करून शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे. देशात दिव्यांग मंत्रालय सुरू करणारे पहिले राज्य हे आपले महाराष्ट्र राज्य आहे. तसेच पालिका स्तरावर याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर शासन त्यासाठी नक्की सहकार्य करेल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अभिनेता आणि निर्माता आमिर खान, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, अनिल त्रिवेदी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

आयएसएफ २०२५ अंतर्गत ‘वन इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत अरजित मोरे विजेता

मुंबई  : महाराष्ट्रातील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी अरजित अमोल मोरे यांची ‘वन इनोव्हेशन – टुवर्ड्स अ सेल्फ रिलायंट

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक 'सलामी ' मुंबई  : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात

मुंबईतील ९ विधानसभांमध्ये उबाठाचे 'शून्य' नगरसेवक

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा उबाठा ठरला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील ०९

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील