उत्तराखंडमध्ये जीप नदीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

  66

डेहराडून: उत्तराखंडच्या पिथोरागड येथे आज,मंगळवारी जीप नदीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहन मुवानीहून बोक्ता गावाकडे जात असताना हा अपघात झाला.


उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी जीप दुपारी 4 वाजेच्या सुमाराला नियंत्रण गमावून 150 मीटर खोल नदीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शाळकरी मुलीसह 4 महिलांचा समावेश आहे. तर 5 जण जखमी आहेत. जीपमध्ये एकूण 13 प्रवासी होती. अपघाताची बातमी पसरताच परिसरात शोककळा पसरली आणि स्थानिक लोकांनी प्रशासनासह तातडीने बचावकार्य सुरू केले.


जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातग्रस्त जीप प्रवाशांना घेऊन मुवानीहून बक्ताकडे जात होती. जीप बक्तापासून थोड्या अंतरावर होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप खड्ड्यात उलटून नदीत पडली. सोनी पुलाजवळ हा अपघात झाला. नदीत कोसळल्याने जीपचा चुराडा झाला. जीप शेजारीच प्रवाशांचे मृतदेह पडले होते. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळावरून 8 मृतदेह बाहेर काढले. मृतांसोबत सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवली जात आहे.


दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि मदत आणि बचाव पथकांना बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी