उत्तराखंडमध्ये जीप नदीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

डेहराडून: उत्तराखंडच्या पिथोरागड येथे आज,मंगळवारी जीप नदीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहन मुवानीहून बोक्ता गावाकडे जात असताना हा अपघात झाला.


उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी जीप दुपारी 4 वाजेच्या सुमाराला नियंत्रण गमावून 150 मीटर खोल नदीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शाळकरी मुलीसह 4 महिलांचा समावेश आहे. तर 5 जण जखमी आहेत. जीपमध्ये एकूण 13 प्रवासी होती. अपघाताची बातमी पसरताच परिसरात शोककळा पसरली आणि स्थानिक लोकांनी प्रशासनासह तातडीने बचावकार्य सुरू केले.


जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातग्रस्त जीप प्रवाशांना घेऊन मुवानीहून बक्ताकडे जात होती. जीप बक्तापासून थोड्या अंतरावर होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप खड्ड्यात उलटून नदीत पडली. सोनी पुलाजवळ हा अपघात झाला. नदीत कोसळल्याने जीपचा चुराडा झाला. जीप शेजारीच प्रवाशांचे मृतदेह पडले होते. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळावरून 8 मृतदेह बाहेर काढले. मृतांसोबत सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवली जात आहे.


दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि मदत आणि बचाव पथकांना बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव