उत्तराखंडमध्ये जीप नदीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

डेहराडून: उत्तराखंडच्या पिथोरागड येथे आज,मंगळवारी जीप नदीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहन मुवानीहून बोक्ता गावाकडे जात असताना हा अपघात झाला.


उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी जीप दुपारी 4 वाजेच्या सुमाराला नियंत्रण गमावून 150 मीटर खोल नदीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शाळकरी मुलीसह 4 महिलांचा समावेश आहे. तर 5 जण जखमी आहेत. जीपमध्ये एकूण 13 प्रवासी होती. अपघाताची बातमी पसरताच परिसरात शोककळा पसरली आणि स्थानिक लोकांनी प्रशासनासह तातडीने बचावकार्य सुरू केले.


जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातग्रस्त जीप प्रवाशांना घेऊन मुवानीहून बक्ताकडे जात होती. जीप बक्तापासून थोड्या अंतरावर होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप खड्ड्यात उलटून नदीत पडली. सोनी पुलाजवळ हा अपघात झाला. नदीत कोसळल्याने जीपचा चुराडा झाला. जीप शेजारीच प्रवाशांचे मृतदेह पडले होते. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळावरून 8 मृतदेह बाहेर काढले. मृतांसोबत सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवली जात आहे.


दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि मदत आणि बचाव पथकांना बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच