सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप झाले वेगळे, ७ वर्षांपूर्वी झाले होते लग्न

a भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी आपला जोडीदार पारुपल्ली कश्यपासून वेगळे होण्याची घोषणा केली. सायनाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून याची माहिती दिली आहे. सायना आणि पारुपल्ली यांचे ७ वर्षांपूर्वी लग्न झाल होते. दोघेही हैदराबाद येथे पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होते. दोघेही दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१८मध्ये त्यांनी लग्न केले होते.


सायना नेहवालने २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते तर २०१५मध्ये वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये तिने पहिले स्थान मिळवत इतिहास रचला होता. ती जगातील नंबर वन बनणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होती. खेळामध्ये ती स्पोर्ट्स आयकॉन होती. तर पारुपल्ली कश्यपने २०१४मध्ये कॉमनवेल्स गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तसेच वर्ल्ड रँकिंगमध्ये तो सहाव्या स्थानावर पोहोचला होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत आपली ओळख बनवली होती.



सायना नेहवालने रविवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर एक धक्कादायक विधान केले. तिने लिहिले, आयुष्य कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेला नेते. खूप विचार विनिमयानंतर कश्यप पारुपल्ली आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि दिलासेचा मार्ग निवडला आहे. मी त्या क्षणांसाठी आभारी आहे आणि पुढील प्रवास चांगला होईल अशी आशा करते. या दरम्यान आमच्या प्रायव्हसीचा आदार राखण्यासाठी धन्यवाद. दरम्यान, कश्यपकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.


Comments
Add Comment

Italian Open 2026 Jannik Sinner : जॅनिक सिनर ठरला इटालियन ओपनचा विजेता; केली नोव्हाक जोकोविचच्या विक्रमाशी बरोबरी

- जॅनिक सिनर ठरला करिअर गोल्डन मास्टर्स पूर्ण करणारा जगातील दुसरा टेनिसपटू जॅनिक सिनरने इटालियन ओपन २०२६ चे

IPL 2026 DC vs RR : रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर ५ विकेट्सने मात

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली

Hind Kesari : फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळचा हात जखमी; महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा 'हिंद केसरी'!

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठा

Indian Cricket Team : टीम इंडियात फेरबदलाचे संकेत; पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याची शक्यता!

मुंबई : सध्या IPL २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफमध्ये कोणते संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या