महाराजांच्या किल्ल्यांचा गौरव! विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष

मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महायुतीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर हा जल्लोष साजरा केला.





राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याला जोरदार सुरुवात झालेली बघायला मिळाली आहे. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याचा आनंद सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर नारेबाजी करत साजरा केला.



दरम्यान, आजच्या सभागृहात, विशेषतः विधान परिषदेत, विरोधी पक्षातील महायुतीच्या सदस्यांनी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून सरकारला जाब विचारण्याची आणि कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. यामुळे सभागृहातील चर्चा तणावपूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment

Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; ईडीनंतर सीबीआयकडून कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम सुरु

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआयने मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंदवला

महानगरपालिकेच्या सर्वच कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण राष्ट्रीय गीत वाजणार, सभागृहात केला ठराव मंजूर

मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय

मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची

महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या