महाराजांच्या किल्ल्यांचा गौरव! विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष

मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महायुतीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर हा जल्लोष साजरा केला.





राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याला जोरदार सुरुवात झालेली बघायला मिळाली आहे. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याचा आनंद सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर नारेबाजी करत साजरा केला.



दरम्यान, आजच्या सभागृहात, विशेषतः विधान परिषदेत, विरोधी पक्षातील महायुतीच्या सदस्यांनी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून सरकारला जाब विचारण्याची आणि कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. यामुळे सभागृहातील चर्चा तणावपूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास