लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांचा वाढला आकडा!

मतदारांची संख्या २४ लाखांच्या जवळ 


पालघर (गणेश पाटील): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत १ जुलै २०२५ रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना मतदान करता येणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे १ जुलै २०२५ ची पालघर जिल्ह्यातील मतदार संख्या पाहता, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजेच अवघ्या १३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल २ लाख ४० हजार ९१५ मतदारांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांचा वाढलेला टक्का आगामी निवडणुकीत कोणाला फायदा देणारा तर कोणाला झटका देणारा ठरणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यापासून वर्षभरात सर्वच दिवसांमध्ये ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येते. त्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी शासनाकडून कोणताही कार्यक्रम राबविण्यात आला नाही तरीदेखील सर्वच विधानसभा मतदार संघांमध्ये मतदारांची संख्या ही वाढत जात आहे. मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही २१ लाख ४८ हजार ८५० एवढी होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी लोकसभा क्षेत्रात २२ लक्ष १९ हजार ३३ मतदारांची नोंद होती. तसेच १ जुलै २०२५ पर्यंत जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या २३ लक्ष ८९ हजार ७६५ इतकी झाली आहे.



विधानसभा निवडणुकीनंतर ९७ हजार मतदार वाढले 


पालघर जिल्ह्यात मतदार संख्येच्या तुलनेत सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेल्या नालासोपारा या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर ते १ जुलैपर्यंत ४५ हजार ०६९ मतदारांची वाढ झाली आहे. त्या खालोखाल जास्त मतदारांची वाढ बोईसर विधानसभा मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघात १ जुलै पर्यंत २४ हजार ६३५ मतदार वाढलेले आहेत. तसेच वसई मतदारसंघात ८ हजार ३८६, पालघर मतदार संघात ५ हजार ९०३ , विक्रमगड मतदारसंघात ५ हजार ४७३, आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात ८ हजार २३३ मतदारांची वाढ १ जुलै २०२५ पर्यंत झालेली आहे.



१ जुलै २०२५ रोजी मतदारांची संख्या


विधानसभा मतदारसंघ        एकूण मतदार संख्या
डहाणू                                 ३ लाख ९ हजार ४७२
विक्रमगड                           ३ लाख २३ हजार २१४
पालघर                               ३ लाख ४ हजार ४८२
बोईसर                               ४ लाख ३५ हजार ९६४
नालासोपारा                        ६ लाख ५३ हजार ५९५
वसई                                   ३ लाख ६३ हजार ०३८
एकूण                                 २३ लाख ८९ हजार ७६५


Comments
Add Comment

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६६ मृतांची नावे

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात SIR मोहिमेत मोठी आकडेवारी समोर

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

PM Modi IIT Delhi Convocation : "मी काय बाबा बागेश्वर नाही..."; IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात PM मोदींचं मिश्कील वक्तव्य

नवी दिल्ली : आयआयटी दिल्ली (IIT Delhi) च्या ५७ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रमुख पाहुणे

Vinayak Raut : सुनेने केलेल्या कौटुंबिक छळ अन् अंधश्रद्धेच्या आरोपांवर सुनावणी; विनायक राऊतांना कोर्टाकडून अटकपूर्व जामीन

ठाणे : माजी खासदार आणि शिवसेना (UBT) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांना ठाणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Nashik News : बॅनर लावताना विजेचा धक्का बसला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ! तरुणाचा मृत्यू

Nashik News : नाशिक शहरात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह शिगेला असताना आणि मित्रांसोबत

Milk Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा नवा झटका; गाई-म्हशीचे दूध महागले! ११ ऑगस्टपासून नवे दर लागू

महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. डिझेल, साखर आणि पॅकिंग