लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांचा वाढला आकडा!

मतदारांची संख्या २४ लाखांच्या जवळ 


पालघर (गणेश पाटील): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत १ जुलै २०२५ रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना मतदान करता येणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे १ जुलै २०२५ ची पालघर जिल्ह्यातील मतदार संख्या पाहता, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजेच अवघ्या १३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल २ लाख ४० हजार ९१५ मतदारांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांचा वाढलेला टक्का आगामी निवडणुकीत कोणाला फायदा देणारा तर कोणाला झटका देणारा ठरणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यापासून वर्षभरात सर्वच दिवसांमध्ये ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येते. त्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी शासनाकडून कोणताही कार्यक्रम राबविण्यात आला नाही तरीदेखील सर्वच विधानसभा मतदार संघांमध्ये मतदारांची संख्या ही वाढत जात आहे. मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही २१ लाख ४८ हजार ८५० एवढी होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी लोकसभा क्षेत्रात २२ लक्ष १९ हजार ३३ मतदारांची नोंद होती. तसेच १ जुलै २०२५ पर्यंत जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या २३ लक्ष ८९ हजार ७६५ इतकी झाली आहे.



विधानसभा निवडणुकीनंतर ९७ हजार मतदार वाढले 


पालघर जिल्ह्यात मतदार संख्येच्या तुलनेत सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेल्या नालासोपारा या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर ते १ जुलैपर्यंत ४५ हजार ०६९ मतदारांची वाढ झाली आहे. त्या खालोखाल जास्त मतदारांची वाढ बोईसर विधानसभा मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघात १ जुलै पर्यंत २४ हजार ६३५ मतदार वाढलेले आहेत. तसेच वसई मतदारसंघात ८ हजार ३८६, पालघर मतदार संघात ५ हजार ९०३ , विक्रमगड मतदारसंघात ५ हजार ४७३, आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात ८ हजार २३३ मतदारांची वाढ १ जुलै २०२५ पर्यंत झालेली आहे.



१ जुलै २०२५ रोजी मतदारांची संख्या


विधानसभा मतदारसंघ        एकूण मतदार संख्या
डहाणू                                 ३ लाख ९ हजार ४७२
विक्रमगड                           ३ लाख २३ हजार २१४
पालघर                               ३ लाख ४ हजार ४८२
बोईसर                               ४ लाख ३५ हजार ९६४
नालासोपारा                        ६ लाख ५३ हजार ५९५
वसई                                   ३ लाख ६३ हजार ०३८
एकूण                                 २३ लाख ८९ हजार ७६५


Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे

India-Chile CEPA : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग; वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिलीच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची घेतली भेट

नवी दिल्ली : भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी वाणिज्य सचिव राजेश

पंतप्रधान मोदी १३७ व्या 'मन की बात'मधून कोणत्या विषयांवर काय बोलले ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी १३७ व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला