सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई: २० लाखांच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या ३ तासांत अटक केली

सांगली: सांगली पोलिसांनी एका धाडसी दरोड्याचा छडा लावत अवघ्या तीन तासांत एका आरोपीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर, भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ जुलै रोजी पहाटे २:४३ ते ३:४५ दरम्यान घडलेल्या या घटनेत एका सराफ व्यापाऱ्याकडून २० लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पोपट हासबे (रा. हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली) हे सराफ व्यापारी आपल्या साथीदारांसह जात असताना, ८ ते १० जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि २० लाखांची रोकड लुटली. सातारा कंट्रोल रूमकडून माहिती मिळताच, सांगली पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले.


पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. पोहेकॉं उदय साळुंखे आणि सागर टिंगरे यांना तासगावजवळ आरोपींच्या गाडीचा अपघात झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. अपघातानंतर दरोडेखोर डोंगराळ भागात पळून गेले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने डोंगरात शोधमोहीम राबवली आणि विनीत राधाकृष्णन (वय ३०, रा. पलाकाठ, केरळ) नावाच्या एका आरोपीला लपलेल्या अवस्थेत पकडले.


आरोपी विनीत राधाकृष्णन याने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याचे साथीदार पळून गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर हायवेवर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पुढील तपास भुईज पोलीस करत आहेत. सांगली पोलिसांनी दाखवलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सांगलीत २४ वर्षीय तरुणाची हत्या, परिसरात भीतीचे वातावरण
सांगली, १२ जुलै २०२५: शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून, वाल्मिकी आवास परिसरात एका २४ वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ कांबळे असे या मृत तरुणाचे नाव असून, अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार