मागणी घटल्याने कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्याची चिंता वाढली

लासलगाव : मागील काही दिवसापासून सातत्याने कांद्याच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे आणि आवश्यक त्या पद्धतीप्रमाणे खरेदी होत असल्यामुळे भावामध्ये मोठ्या प्रमाणावर ती घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कांद्याचे पीक घेऊन कर्जबाजारी होत असल्याचे चित्र समोर येत आहे.


कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सध्या लासलगाव व पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर ७०० ते ८५० रुपये क्विंटल इतके असून, उत्पादन खर्च १२०० ते १४०० रुपये क्विंटल आहे. या तफावतीमुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला.


लासलगाव बाजार समितीत दररोज सरासरी १८ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक असूनही व्यापाऱ्यांची मागणी मंदावली आहे. 'नाफेड'ची खरेदी निवडक बाजारा समितीमध्ये झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. परिणामी, मोठ्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.


सातत्याने कांद्याच्या दरामध्ये घट होण्यामागे या परिसरातील जाणकारांच्या मते बाजारातील कांद्याची मागणी ही कमी झालेली आहे. कांद्याची साठवणूक करण्याची मर्यादा यावर मोठा परिणाम करीत आहे. निर्यात क्षेत्रामध्ये केंद्र सरकारचे जे धोरण आहे. ते पूर्णपणे धरसोड वृत्तीचे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हात दरावरती होत आहे.

Comments
Add Comment

Cabinet Decision: शेतकरी कर्जमाफीचे निकष जाहीर

दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान देणार मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांना

Cabinet decision : ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधांना बूस्टर

 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजने'साठी ६ हजार ४२९ कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण संपर्क

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

मुंबई  : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक

रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा