मागणी घटल्याने कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्याची चिंता वाढली

लासलगाव : मागील काही दिवसापासून सातत्याने कांद्याच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे आणि आवश्यक त्या पद्धतीप्रमाणे खरेदी होत असल्यामुळे भावामध्ये मोठ्या प्रमाणावर ती घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कांद्याचे पीक घेऊन कर्जबाजारी होत असल्याचे चित्र समोर येत आहे.


कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सध्या लासलगाव व पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर ७०० ते ८५० रुपये क्विंटल इतके असून, उत्पादन खर्च १२०० ते १४०० रुपये क्विंटल आहे. या तफावतीमुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला.


लासलगाव बाजार समितीत दररोज सरासरी १८ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक असूनही व्यापाऱ्यांची मागणी मंदावली आहे. 'नाफेड'ची खरेदी निवडक बाजारा समितीमध्ये झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. परिणामी, मोठ्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.


सातत्याने कांद्याच्या दरामध्ये घट होण्यामागे या परिसरातील जाणकारांच्या मते बाजारातील कांद्याची मागणी ही कमी झालेली आहे. कांद्याची साठवणूक करण्याची मर्यादा यावर मोठा परिणाम करीत आहे. निर्यात क्षेत्रामध्ये केंद्र सरकारचे जे धोरण आहे. ते पूर्णपणे धरसोड वृत्तीचे आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हात दरावरती होत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची उघडीप कायम; 'या' तारखेनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून २१ जुलैनंतर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; जुलैअखेर चांगल्या पावसाचा अंदाज राज्यात पुन्हा एकदा

Ashadhi Wari 2026 : वारीत वाटण्यासाठी आणलेल्या शीतपेयामुळे २ परिचारिकांना विषबाधा; अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई

धाराशिव : धाराशिवमध्ये शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. भाविकांना

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरांचा धुमाकूळ! ६७ महिला, २२ पुरुषांसह ८९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात (Palkhi Procession) लाखो वारकरी

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली'च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती