IND vs ENG: केएल राहुल बनला लॉर्ड्सच्या मैदानात एकापेक्षा अधिक शतक झळकवणारा दुसरा भारतीय खेळाडू

लंडन : इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानात लोकेश राहुलनं आश्वासक खेळी करताना विक्रमी शतक साजरे केले आहे. लॉर्ड्सच्या मैदानात त्याच्या भात्यातून आलेले हे सलग दुसरे अन् विक्रमी शतक ठरले. इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदानात एका पेक्षा अधिक शतक झळकवणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात राहुलनं १७७ चेंडूत १३ चौकाराच्या मदतीने इंग्लंडच्या मैदानातील चौथे अन् कसोटी कारकिर्दीतील १० शतक साजरे केले.


इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानात सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय स्टार खेळाडूंपैकी एकालाही कसोटीत शतक झळकावता आलेले नाही. फक्त दिलीप वेंगसरकर हे एकमेव असे फलंदाज आहेत ज्यांनी इथं ३ शतकी खेळी करण्याचा पराक्रम करून दाखवलाय. त्यापाठोपाठ आता लोकेश राहुल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.


लॉर्ड्सच्या मैदानात कर्णधार शुबमन गिलसह यशस्वी जैस्वाल आणि करुण नायर हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परल्यावर लोकेश राहुलनं रिषभ पंतच्या साथीनं संघाच्या डावाला आकार दिला. लंचआधी त्याने पंतच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी रचली. लंच ब्रेकनंतर शतक साजरे केल्यावर लोकेश राहुल अन्य फलंदाजांसोबत मैदानात तग धरून थांबेल, अशी वाटत होती. इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजासमोर तो अगदी आरामात खेळताना दिसला. पण शोएब बशीरच्या गोलंदाजीवर तो फसला. शंभरीवरच तो हॅरी ब्रूकच्या हाती झेल देऊन बाद झाला.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण