IND vs ENG: भारतासमोर विजयासाठी १९३ धावांचे आव्हान, मात्र यशस्वी शून्यावरच बाद

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताला विजयासाठी १९३ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला. वॉशिंग्टन सुंदरला या सामन्यात ४ विकेट मिळाल्या. तर बुमराह आणि सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. दरम्यान, भारताची सुरूवात खराब राहिली. सलामीवीर यशस्वी जायसवाल खाते न खोलताच बाद झाला.


इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही ३८७ धावांवरट आटोपला. म्हणजेच पहिल्या डावात दोन्ही संघ बरोबरीत होते. आता लॉर्ड्स कसोटीत भारताला विजयासाठी १९३ धावा करायच्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा केवळ एक षटक खेळता आले. या षटकांत भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा सलामी फलंदाज जॅक क्राऊली यांच्यात वादावादी झाली.



भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलचे शतक


भारतीय संघाच्या पहिल्या डावात सलामीवीर केएल राहुलने शतक ठोकले. राहुलने १७७ बॉलमध्ये १०० धावा केल्या. यात १३ चौकारांचा समावेश आहे. राहुलचे कसोटी करिअरमधील हे दहावे शतक आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ७४ धावा आणि रवींद्र जडेजाने ७२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.


Comments
Add Comment

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला धक्का!

अहमदाबाद: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला

ICC Womens World Cup : भारतीय संघाची विजयी सलामी

गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात

ICC Womens cricket world cup : दीप्ती-अमनजोतची दमदार अर्धशतके; श्रीलंकेसमोर २७० धावांचे आव्हान

गुवाहाटी: आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) च्या पहिल्याच सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेसमोर २७०

आशिया कप ट्रॉफी वादावर बीसीसीआय आक्रमक! विजेत्या संघाला ट्रॉफी का दिली नाही? नक्वींना राजीव शुक्लांचा थेट सवाल

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले असले तरी, पारितोषिक

ICC Womens Cricket World Cup 2025: आता वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येणार भारत-पाकिस्तान

कोलंबो: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025)