डोंबिवली एमआयडीसीमध्ये गढूळ पाण्याने नागरिक त्रस्त, नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न

खोदकाम करताना पाईपलाईन नादुरुस्त


कल्याण (वार्ताहर) :डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये रहिवाशांच्या घरात गडूळ पाणी येत असल्याने नागरिक संतापले असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवार दुपारपासून मिलाप नगरमधील वसंत छेडा आणि इतर काही बंगल्यांमध्ये गढूळ, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी बेत असल्याचे दिसल्यावर काहींनी ते समाज माध्यमावर टाकून आपली नाराजी व्यक्त केली, तर काहींनी ही बाब एमआयडीसीला कळविली.


मिलापनगर मधील बहुतेक बंगलोमध्ये त्यांच्या किचनमध्ये एमआयडीसी पाईपलाईनमधून एक जोड्णी थेट घेण्यात आली आहे. त्यामुळे ते पाणी टाकीत न जाता थेट घरात व स्वयंपाकघरात जात असते. तेच पाणी पिण्यासाठी आणि अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरत असतात; परंतु हे पाणी गढूळ येत असल्याने नागरिकांपुढे आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला झाला आहे.


गढूळ पाणी आल्याने काही रहिवाशांनी पॅकबंद बाटलीतले पाणी विकत आणून आपली गरज भागविली. हे गढूळ पाणी येण्याचे कारण काय असावे याबद्दल काही नागरिकांनी शोध घेतला असता एमआयडीसीमध्ये नवीन नाले गटारांची आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे जोरात सुरू असून त्यामुळे खोदकाम करताना पाण्याच्या पाईपलाईन या नादुरुस्त होत असल्याने त्यावेळी त्यात बाहेरील पावसाचे आणि उघड्या गटारातील पाणी मिसळले जात असावे. तसेच काही ठिकाणो पाण्याच्या भूमिगत पाईप लाईनला काँक्रीट रस्ते, सांडपाणी वाहिन्या इत्यादी बनविताना धक्के बसून पाईप लाईनला चिरा पडून पाण्याची गळती जमिनीत सुरू असावी, अशा अनेक कारणांमुळे गढूळ, अस्वच्छ पाणी येत असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


एमआयडीसीकडून याबद्दल माहिती मिळाली नसून त्यांच्याकडून ही गंभीर बाब दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गरम करून उकळून प्यावे अशी विनंती सर्वांना करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस