डोंबिवली एमआयडीसीमध्ये गढूळ पाण्याने नागरिक त्रस्त, नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न

खोदकाम करताना पाईपलाईन नादुरुस्त


कल्याण (वार्ताहर) :डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये रहिवाशांच्या घरात गडूळ पाणी येत असल्याने नागरिक संतापले असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवार दुपारपासून मिलाप नगरमधील वसंत छेडा आणि इतर काही बंगल्यांमध्ये गढूळ, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी बेत असल्याचे दिसल्यावर काहींनी ते समाज माध्यमावर टाकून आपली नाराजी व्यक्त केली, तर काहींनी ही बाब एमआयडीसीला कळविली.


मिलापनगर मधील बहुतेक बंगलोमध्ये त्यांच्या किचनमध्ये एमआयडीसी पाईपलाईनमधून एक जोड्णी थेट घेण्यात आली आहे. त्यामुळे ते पाणी टाकीत न जाता थेट घरात व स्वयंपाकघरात जात असते. तेच पाणी पिण्यासाठी आणि अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरत असतात; परंतु हे पाणी गढूळ येत असल्याने नागरिकांपुढे आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला झाला आहे.


गढूळ पाणी आल्याने काही रहिवाशांनी पॅकबंद बाटलीतले पाणी विकत आणून आपली गरज भागविली. हे गढूळ पाणी येण्याचे कारण काय असावे याबद्दल काही नागरिकांनी शोध घेतला असता एमआयडीसीमध्ये नवीन नाले गटारांची आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे जोरात सुरू असून त्यामुळे खोदकाम करताना पाण्याच्या पाईपलाईन या नादुरुस्त होत असल्याने त्यावेळी त्यात बाहेरील पावसाचे आणि उघड्या गटारातील पाणी मिसळले जात असावे. तसेच काही ठिकाणो पाण्याच्या भूमिगत पाईप लाईनला काँक्रीट रस्ते, सांडपाणी वाहिन्या इत्यादी बनविताना धक्के बसून पाईप लाईनला चिरा पडून पाण्याची गळती जमिनीत सुरू असावी, अशा अनेक कारणांमुळे गढूळ, अस्वच्छ पाणी येत असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


एमआयडीसीकडून याबद्दल माहिती मिळाली नसून त्यांच्याकडून ही गंभीर बाब दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गरम करून उकळून प्यावे अशी विनंती सर्वांना करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.

Comments
Add Comment

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,

Madgaon Tejas Express : तेजस एक्स्प्रेसमध्ये नाश्त्याऐवजी बिस्किट पुडा! IRCTCकडून कंत्राटदाराला दणका!

मडगाव : मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये (Madgaon Tejas Express) प्रवाशांना दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत