डोंबिवली एमआयडीसीमध्ये गढूळ पाण्याने नागरिक त्रस्त, नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न

  50

खोदकाम करताना पाईपलाईन नादुरुस्त


कल्याण (वार्ताहर) :डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये रहिवाशांच्या घरात गडूळ पाणी येत असल्याने नागरिक संतापले असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवार दुपारपासून मिलाप नगरमधील वसंत छेडा आणि इतर काही बंगल्यांमध्ये गढूळ, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी बेत असल्याचे दिसल्यावर काहींनी ते समाज माध्यमावर टाकून आपली नाराजी व्यक्त केली, तर काहींनी ही बाब एमआयडीसीला कळविली.


मिलापनगर मधील बहुतेक बंगलोमध्ये त्यांच्या किचनमध्ये एमआयडीसी पाईपलाईनमधून एक जोड्णी थेट घेण्यात आली आहे. त्यामुळे ते पाणी टाकीत न जाता थेट घरात व स्वयंपाकघरात जात असते. तेच पाणी पिण्यासाठी आणि अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरत असतात; परंतु हे पाणी गढूळ येत असल्याने नागरिकांपुढे आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला झाला आहे.


गढूळ पाणी आल्याने काही रहिवाशांनी पॅकबंद बाटलीतले पाणी विकत आणून आपली गरज भागविली. हे गढूळ पाणी येण्याचे कारण काय असावे याबद्दल काही नागरिकांनी शोध घेतला असता एमआयडीसीमध्ये नवीन नाले गटारांची आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे जोरात सुरू असून त्यामुळे खोदकाम करताना पाण्याच्या पाईपलाईन या नादुरुस्त होत असल्याने त्यावेळी त्यात बाहेरील पावसाचे आणि उघड्या गटारातील पाणी मिसळले जात असावे. तसेच काही ठिकाणो पाण्याच्या भूमिगत पाईप लाईनला काँक्रीट रस्ते, सांडपाणी वाहिन्या इत्यादी बनविताना धक्के बसून पाईप लाईनला चिरा पडून पाण्याची गळती जमिनीत सुरू असावी, अशा अनेक कारणांमुळे गढूळ, अस्वच्छ पाणी येत असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


एमआयडीसीकडून याबद्दल माहिती मिळाली नसून त्यांच्याकडून ही गंभीर बाब दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गरम करून उकळून प्यावे अशी विनंती सर्वांना करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत