ठाकूरवाडीच्या विद्यार्थ्यांची उपरोधिक मागणी: "चंद्रावर जाऊ, पण शाळेपर्यंत रस्ता द्या!"

  61

पालघर: एकीकडे पालघर जिल्ह्यात हजारो कोटींचे प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि भव्य रस्ते आकाराला येत असताना, दुसरीकडे मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमधील ठाकूरवाडी येथील विद्यार्थ्यांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे. निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने, चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज चिखल आणि पाण्याने भरलेल्या वाटेतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या विदारक परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकारला उपरोधिक मागणी केली आहे: "आम्ही शाळा शिकून चंद्रावर, मंगळावरही जाऊ, पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या!"


ठाकूरवाडीतील जवळपास १५ ते २० विद्यार्थी दररोज निरगुडवाडी येथील शाळेत पायी जातात. हे अंतर १ ते दीड किलोमीटरच्या आसपास असल्याने येथे बससेवेचा प्रश्नच येत नाही, कारण जिथे चालण्यासाठीही धड रस्ता नाही, तिथे बस जाणे अशक्य आहे. त्यामुळे पाठीवर दप्तर घेऊन हे विद्यार्थी दररोज ये-जा करतात.


मात्र, पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि चिखल होतो. या चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. अनेकदा रस्त्यावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना भिंतीवरून उड्या मारून जावे लागते. नुकतीच एका विद्यार्थ्याचा उडी मारताना पडल्याची घटनाही ग्रामस्थांनी सांगितली.


या बिकट परिस्थितीमुळे पालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना आपली कामे सोडून त्यांच्यासोबत जावे लागते. "रस्ता चांगला केला तर एखादी गाडी किंवा मुले चालतही कोणत्याही अडचणीशिवाय जाऊ शकतील," असे एका ग्रामस्थाने सांगितले.


जर हीच परिस्थिती राहिली, तर पावसाळ्यात मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा इशाराही संतप्त पालकांनी दिला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असे ते म्हणाले. अन्यथा, बांधकाम विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवू, असेही त्यांनी उपरोधिकपणे सुनावले आहे.


जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांची ही व्यथा प्रशासनासाठी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

माजी बँक अध्यक्ष 'फरार' घोषित!

मुंबई: १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालयाने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह