ठाकूरवाडीच्या विद्यार्थ्यांची उपरोधिक मागणी: "चंद्रावर जाऊ, पण शाळेपर्यंत रस्ता द्या!"

पालघर: एकीकडे पालघर जिल्ह्यात हजारो कोटींचे प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि भव्य रस्ते आकाराला येत असताना, दुसरीकडे मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमधील ठाकूरवाडी येथील विद्यार्थ्यांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे. निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने, चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज चिखल आणि पाण्याने भरलेल्या वाटेतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या विदारक परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकारला उपरोधिक मागणी केली आहे: "आम्ही शाळा शिकून चंद्रावर, मंगळावरही जाऊ, पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या!"


ठाकूरवाडीतील जवळपास १५ ते २० विद्यार्थी दररोज निरगुडवाडी येथील शाळेत पायी जातात. हे अंतर १ ते दीड किलोमीटरच्या आसपास असल्याने येथे बससेवेचा प्रश्नच येत नाही, कारण जिथे चालण्यासाठीही धड रस्ता नाही, तिथे बस जाणे अशक्य आहे. त्यामुळे पाठीवर दप्तर घेऊन हे विद्यार्थी दररोज ये-जा करतात.


मात्र, पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि चिखल होतो. या चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. अनेकदा रस्त्यावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना भिंतीवरून उड्या मारून जावे लागते. नुकतीच एका विद्यार्थ्याचा उडी मारताना पडल्याची घटनाही ग्रामस्थांनी सांगितली.


या बिकट परिस्थितीमुळे पालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना आपली कामे सोडून त्यांच्यासोबत जावे लागते. "रस्ता चांगला केला तर एखादी गाडी किंवा मुले चालतही कोणत्याही अडचणीशिवाय जाऊ शकतील," असे एका ग्रामस्थाने सांगितले.


जर हीच परिस्थिती राहिली, तर पावसाळ्यात मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा इशाराही संतप्त पालकांनी दिला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असे ते म्हणाले. अन्यथा, बांधकाम विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवू, असेही त्यांनी उपरोधिकपणे सुनावले आहे.


जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांची ही व्यथा प्रशासनासाठी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी

जागतिक प्रायव्हेट वेचंर कॅपिटल गुंतवणूकीत १२० अब्ज डॉलर्सने वाढ मात्र भारतात गुंतवणूक मंदावली - KPMG Report

प्रतिनिधी: केपीएमजी प्रायव्हेट एंटरप्राइझच्या व्हेंचर पल्सच्या नव्या रिपोर्ट आवृत्तीनुसार, जागतिक वेंचर

कधी आहे कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि पूजा विधी

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित असते. शुक्ल पक्षातील

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर