फ्लिपकार्टने नष्ट करण्यासाठी दिलेल्या कालबाह्य साहित्याची विक्री; दोन जणांना अटक

ठाणे : भारतातील एक नामवंत ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीकडून नष्ट करण्यासाठी दिलेल्या कालबाह्य झालेल्या अन्नधान्य तसेच इतर साहित्यांची दुसऱ्या कंपनीच्या नावे विक्री करणाऱ्या दोन जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शीळ-डायघर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून कालबाह्य झालेल्या साहित्याची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.


मोहमद इरफान मोहमद मुनीर चौधरी (४१) आणि मोहमद अक्रम मोहमद इस्माईल शेख (५८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील मोहमद चौधरी हा मुंबईतील साकीनाका भागात तर, मोहमद शेख हा भिवंडीतील गौरीपाडा भागात राहतो. हे दोघे इको स्टार रिसायकलिंग अण्ड ई-वेस्ट रिसायकलिंग कंपनीचे मालक आहेत. फ्लिपकार्ट कंपनीकडून कालबाह्य झालेले साहित्य नष्ट करण्याचे काम इको स्टार रिसायकलिंग कंपनीला दिले जाते. मात्र, हे साहित्य नष्ट करण्याऐवजी ते दुसऱ्या कंपनीच्या नावाने बाजारात विकले जात असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने शीळ येथील इको स्टार रिसायकलिंग कंपनीच्या गोदामावर धाड टाकली.



मुळ कंपनीचे आवरण काढून विक्री


त्यावेळी फ्लिपकार्ट कंपनीकडून नष्ट करण्यासाठी पाठविलेले सर्व प्रकारचे अन्नधान्य, कडधान्य, विविध कंपन्यांचे पीठ, साखर, तांदुळ, सुका मेवा, सॅनेटरी पॅड, धुलाई (वॉशिंग)पावडर, साबण असा साहित्य नष्ट करण्याऐवजी त्याच्यावरील मुळ कंपनीचे आवरण काढले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Comments
Add Comment

काय आहे वेगन डाएट? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे!

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असताना, अनेकजण आपल्या आहारात बदल करत आहेत. या

पलंगावरुन पडला आणि पोलीस अंमलदाराचा घात झाला

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी

मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय

रत्नागिरी जिल्ह्यात मर्सिडीज बेंझ जळून खाक

रत्नागिरी : खेड तालुक्यातील नातूनगर येथे मर्सिडीज बेंझ कारला आग लागली. सोमवारी मध्यरात्री २.५० च्या सुमारास ही

देशात सर्वाधिक दैनंदिन वेतन ‘या’ राज्यात मिळते

भारतातील २०२५ मधील आर्थिक स्थिती पाहाता वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दैनंदिन वेतनात मोठी

जिल्ह्यात दिवाळीसाठी ५० जादा गाड्या

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची सुविधा रायगड एसटी महामंडळाने दिवाळी धमाका म्हणून ५० जादा गाड्यांचे नियोजन केले