Chatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण! शिवनेरी ते जिंजी...राज्यातील १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत!

  94

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. महाराजांच्या कोणत्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे ते जाणून घ्या...



शिवनेरी



महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे.



राजगड



राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं जातं. या किल्ल्यावरूनच महाराजांनी मोगलांशी अनेक लढाया लढल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला.



प्रतापगड




येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात लढाई झाली होती. त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठं स्थान आहे.




पन्हाळा




महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक किल्ल्याला एक इतिहास आहे. शिवा काशीद आणि बाजीप्रभूंच्या बलिादानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला.



रायगड




स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ल्यात शिवराज्याभिषेक झाला.

साल्हेर




एक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला.



लोहगड



पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ लोहगड किल्ला आहे. किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू आहेत.



खांदेरी




खांदेरी हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. इंग्रजांवर वचक बवण्यसाठी शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची निर्मिती केली.


सुवर्णदुर्ग



रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराच्या जवळ, हर्णे बंदरात, समुद्रातील एका बेटावर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमारासाठी हा किल्ला बांधला.



विजयदुर्ग




मराठा साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी, इंग्रजांपासून रक्षणासाठी उभारलेला होता. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे एक प्रमुख ठिकाण म्हणून विजयदुर्गला ओळखलं जातं.



सिंधुदुर्ग




छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली.



जिंजी



हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. दक्षिण भारताची ग्रेट वॉल म्हणून जिंजी किल्ल्याची ओळख आहे.


Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल