परभणी: शेतात काम करताना वीजेचा धक्का लागून शेतकरी व दोन बैलांचा दुर्दैवी अंत

परभणी : पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण (बु) शिवारात आज सकाळी (शुक्रवार) एक हृदयद्रावक घटना घडली. कापसाच्या आंतरमशागतीचे काम करत असताना, लोखंडी औताला विद्युत खांबावरील तारेचा स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गोपाळराव घाडगे (वय ४०) हे त्यांचे भाऊ विकास घाडगे यांच्यासोबत त्यांच्या शेतात कापसाच्या पिकाची आंतरमशागत करत होते. बैलजोडीच्या सहाय्याने बैल पाळीचे काम सुरू असताना, शेतातील विद्युत खांबाला आधार देणाऱ्या तारेला लोखंडी औताचा स्पर्श झाला. त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने प्रल्हाद घाडगे आणि त्यांच्या दोन्ही बैलांना जोरदार धक्का बसला. विद्युत प्रवाहाची तीव्रता अधिक असल्याने क्षणार्धातच तिघांचाही जागीच मृत्यू झाला.


प्रल्हाद यांच्या पाठीमागे खताची पेरणी करत असलेले त्यांचे भाऊ विकास घाडगे यांना मात्र करंट लागला नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भाऊ आणि बैल मृत्यूमुखी पडल्याचे पाहून त्यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांच्या मदतीने प्रल्हाद घाडगे यांना तातडीने पाथरी येथील खासगी रुग्णालयातून शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


प्रल्हाद घाडगे हे शांत आणि मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.


या घटनेमुळे महावितरणच्या गलथान कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब आडवे झाले आहेत किंवा तारा लोंबकळत आहेत, तरीही महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाहक नागरिकांना आणि प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह