मुंबई: वसई-विरारमध्ये ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना आता राज्य सरकारकडून मोठा दणका बसणार आहे! असे गैरप्रकार करणाऱ्या बिल्डरांच्या नव्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाणार नाही, इतकेच नव्हे तर त्यांच्या इतर मालमत्तांवरही बोजा (गहण) चढवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
भाजपच्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत वसई-विरारमधील बिल्डरांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आणले होते. लोकांची कष्टाची कमाई बुडवणाऱ्या या बिल्डरांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली होती.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दूध भेसळीचा मुद्दा तापला आहे! भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज ...
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात यावर उत्तर देताना सांगितले की, फसवणूक केलेल्या बिल्डरांना आता धडा शिकवला जाईल. त्यांच्या नव्या प्रकल्पांना मंजुरी नाकारली जाईल, ज्यामुळे त्यांना पुढील व्यवसाय करणे कठीण होईल. तसेच, फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी, अशा बिल्डरांच्या इतर मालमत्तांवरही बोजा चढवण्यात येईल, जेणेकरून त्या मालमत्ता विकता येणार नाहीत आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल.
या निर्णयामुळे वसई-विरार परिसरातील हजारो फसवणूक झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, बिल्डरांच्या गैरव्यवहारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.