Varun Sardesai Nilam Gorhe: जराश्या धक्क्याने वरूण सरदेसाईंचा अकांडतांडव, नीलम गोऱ्हेंनी झापलं

मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सरकार आणि विरोधक या दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर खडाजंगी पाहायला मिळते आहे. यादरम्यानच सभागृहात जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षारक्षकांच्या जराश्या धक्क्याने उबाठा गटाचे आमदार वरुण सरदेसाई अकांड तांडव करताना दिसतात. ज्यात ते "इथे अतिरेकी घुसलेत का?" असे बोलताना दिसून आले. पाहा व्हिडीओ



शिवसेनेना आणि उबाठा गटाचे नेते विधिमंडळ अधिवेशनात आक्रमक झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये आता नीलम गोऱ्हे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये झालेल्या 'दे धक्का' प्रकरणाचा देखील समावेश झाला आहे. आज दुपारच्या प्रहरी शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षा रक्षकाचा चुकून धक्का लागल्याने उबाठा पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विनाकारण कांगावा केला.

काय आहे या व्हिडीओमध्ये?


विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधानभवनात जात असताना उबाठाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुरक्षारक्षकाचा धक्का लागल्यानं संताप व्यक्त केला. इथं काय अतिरेकी घुसलेत,दुसऱ्यांदा धक्का लागला मला, दुसऱ्यांदा झालं हे, असे कसे धक्के लागतात, असा सवाल त्यांनी केला. यादरम्यान नीलम गोऱ्हे यांनी मुद्दामहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगतेय तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती असं म्हणाल्या. यानंतर नीलम गोऱ्हे विधानभवनात गेल्या.
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील