...म्हणून कँटिनच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण, गायकवाडांचे स्पष्टीकरण

मुंबई : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असताना आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच्या कृतीचे समर्थन केले. मंगळवारी रात्री मागवलेल्या जेवणाचे जेमतेम दोन घास खाल्ले आणि मला उलटी झाली. यानंतर नेसत्या वस्त्रांनिशी कँटिनमध्ये जाऊन मी जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत संताप व्यक्त केला. त्यावेळी निकृष्ट अन्नामुळे झालेल्या त्रासातून मी ताबडतोब दिलेली प्रतिक्रिया आहे; असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. ते विधानभवनाच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.



अनेकदा मुंबईत असताना आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटिनमध्ये मी जेवलो आहे. मंगळवार ८ जुलै २०२५ रोजी मी रात्री दोन पोळ्या (चपाती), डाळ (आमटी / दाल), भात (राइस) असे जेवण मागवले. जेवण आले. पहिला खास खाल्ला तेव्हाच गडबड आहे असे वाटले. दुसरा घास खाल्ला आणि उलटी झाली. उलटी झाली म्हणून मी आहे तसाच उठलो आणि कँटिनमध्ये गेलो. कँटिनमध्ये एक कर्मचारी समोर दिसला, त्याला विचारले की माझ्याकडे जेवण कोण घेऊन आले होते ? तिथे मॅनेजरलाही डाळ दाखवली. कँटिनमध्ये जेवणाऱ्या इतरांनाही डाळ दाखवली. सगळ्यांनी हे जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर जे काही झाले ती मी त्रास होत असताना दिलेली प्रतिक्रिया होती; असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.



Comments
Add Comment

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा