...म्हणून कँटिनच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण, गायकवाडांचे स्पष्टीकरण

मुंबई : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असताना आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच्या कृतीचे समर्थन केले. मंगळवारी रात्री मागवलेल्या जेवणाचे जेमतेम दोन घास खाल्ले आणि मला उलटी झाली. यानंतर नेसत्या वस्त्रांनिशी कँटिनमध्ये जाऊन मी जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत संताप व्यक्त केला. त्यावेळी निकृष्ट अन्नामुळे झालेल्या त्रासातून मी ताबडतोब दिलेली प्रतिक्रिया आहे; असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. ते विधानभवनाच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.



अनेकदा मुंबईत असताना आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटिनमध्ये मी जेवलो आहे. मंगळवार ८ जुलै २०२५ रोजी मी रात्री दोन पोळ्या (चपाती), डाळ (आमटी / दाल), भात (राइस) असे जेवण मागवले. जेवण आले. पहिला खास खाल्ला तेव्हाच गडबड आहे असे वाटले. दुसरा घास खाल्ला आणि उलटी झाली. उलटी झाली म्हणून मी आहे तसाच उठलो आणि कँटिनमध्ये गेलो. कँटिनमध्ये एक कर्मचारी समोर दिसला, त्याला विचारले की माझ्याकडे जेवण कोण घेऊन आले होते ? तिथे मॅनेजरलाही डाळ दाखवली. कँटिनमध्ये जेवणाऱ्या इतरांनाही डाळ दाखवली. सगळ्यांनी हे जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर जे काही झाले ती मी त्रास होत असताना दिलेली प्रतिक्रिया होती; असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.



Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये