Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व पारदर्शक पध्दतीने होईल यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल तसेच हरियाणा व अन्य राज्यात राबवण्यात येणाऱ्या कॅशलेस योजनेचाही अभ्यास करू असे मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत आश्वस्त केले.


आमदार सत्यजित तांबे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय योजनेबाबत लक्षवेधी सूचना विधान परिषदेत उपस्थित केली होती. या लक्षवेधीला मुख्यमंत्र्यांच्या वतीने सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्री एँड आशिष शेलार यांनी उत्तर दिले.



त्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये ५ लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण पुरविण्यात येते. ही योजना कॅशलेस आहे. सदर योजनेतील गट ब मध्ये शुभ्र पत्रिका धारक कुटुंबे (शासकीय निम शासकीय कर्मचारी यांसह) कोणत्याही प्रकारचे शिधापत्रक धारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अंगीकृत २१८४ रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांना लाभ अनुज्ञेय आहे सदर योजनेमध्ये २०२०-२१ पासून आतापर्यंत एकूण ३७ लाख ६२ हजार ६०१ प्रकरणांमध्ये ६,९५८.२ कोटी इतका खर्च झालेला आहे.


शिवाय वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेत


सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षात शासनाने प्रतिपुर्तीसाठी अनुक्रमे २३८. १३ कोटी, २४८.३२ कोटी, २१३.८६ कोटी, २२६.४७ कोटी, आणि ३४६.१३ कोटी एवढा खर्च करण्यात आला, अशी माहिती देतानाच मंत्री एँड आशिष शेलार यांनी सांगितले. ही पध्दत अधिक पारदर्शक करु असे त्यांनी आश्वस्त केले.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.