श्रावण महिन्यास उरलेत काही दिवस, पाहा कधीपासून सुरू होणार व्रत-वैकल्ये

मुंबई: आषाढी एकादशी आटोपली की, भाविकांना सण, उत्सवांचा महिना श्रावणाची चाहुल लागते. यंदा गुरुवार, २४ जुलैला आषाढ आमावस्या आटोपली की, २५ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात सृष्टीला जसा पाना, फुलांनी बहर येतो, त्याचप्रमाणे सण-उत्सवांचीही चंगळ राहणार आहे. चारही श्रावण सोमवारी शहरातील गडगडेश्वर, तपोवनेश्वर, कोंडेश्वर, पाताळेश्वर, भुतेश्वर तसेच इतर लहान, मोठ्या मंदिरांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी होणार असून, उत्साह, लहान यात्रा असे धार्मिक वातावरण राहणार आहे. शिवलिंगाचा शृंगार, बिल्वपत्रांचा अभिषेक, महाआरती, पूजा असे विधी पार पाडले जाणार आहेत.


श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला मंदिरांसह घरोघरी नागदेवतेची पूजा होणार असून लाह्या, फुटाणे, वटाणे, करंजीचा फुलोरा, हलव्याचा प्रसाद घरोघरी करून त्याचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान सुवासिनी श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीचे व्रतही करतील. ८ ऑगस्टला नारळी पौर्णिमा तसेच ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. बहीण भावाच्या मनगटावर प्रेमाचे अतूट रेशमी बंध बांधून त्याला नेहमी रक्षण करत राहा, अशी गळ घालणार असून, या दिवशी बहिणी भावाच्या घरी किंवा भाऊ बहिणींच्या घरी जाऊन हातावर राखी बांधतील.


शुक्रवार १५ रोजी राष्ट्रीय उत्सव स्वातंत्र्य दिन शासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालयांसह विविध ठिकाणी साजरा होणार असून, याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरोघरी श्रीकृष्णाचा पाळणा, मूर्तीचे पूजन होणार आहे. शहरातील श्रीकृष्ण मंदिरांसह इस्कॉन मंदिरात याप्रसंगी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्या २२ ऑगस्ट रोजी असून, या दिवशी जिल्ह्यात पोळ्याचा सण साजरा होणार आहे. पोळ्याला बैलजोड्यांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. पोळा या सणाला मराठी श्रावण महिन्याचा समारोप होत असतो. तान्हा पोळ्याला मातीसह लाकडी बैलांची पूजा केली जाणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण महिन्यात सण, उत्सव, व्रत, वैकल्ये केली जातात.


श्रीकृष्ण जन्माष्टमी कावड यात्रेचीही राहणार धूम श्रावण महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात तीन मोठ्या दहिहंडीचे आयोजन केले जाते. युवा स्वाभिमान, मनसे, शिवसेनेद्वारे (शिंदे गट) तीन मोठ्या दहिहंडीचे आयोजन होत असते. यानिमित्त शहरात सिने अभिनेते, पुढाऱ्यांचे आगमन होत असते. दहिहंडीच्या निमित्ताने शहरात उत्साहाला उधाण येते. तसेच दर श्रावण सोमवारी कावड यात्रेचेही मोठे वाजत गाजत शिवालयांमध्ये आगमन होत असते. कावड यात्रेतील देखावे बघण्यासाठी भाविकांची शिवालयांसह रस्त्यांवरही चांगलीच गर्दी होत असते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे