कंपनी अस्तित्वात नाही, संचालकही तुरुंगात!

औषध निर्मितीचा धंदा मात्र जोरात


गणेश पाटील


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या सातिवली महिला व बालसंगोपन केंद्रात आढळलेले बनावट औषध तयार करणारी कंपनी अस्तित्वातच नसून, कंपनीचा संचालकही नागपूर तुरुंगात आहे. तरीसुद्धा औषध निर्मिती केली जात असून, शासकीय रुग्णालयांना पुरवठा देखील होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संपूर्ण राज्यात तपासणी करण्यात येत आहे.


दरम्यान, शासकीय रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणारी अनेक औषधे बनावट स्वरूपाची असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या औषधांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविली.


या मोहिमेत वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सातिवली येथील माता व बालसंगोपन केंद्रातून नेण्यात आलेले Tab. cefixime ip २०० mg. हे औषध बनावट असल्याचे मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेने स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित औषध रुग्णांना देण्यात येऊ नयेत त्यासोबतच या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालघर अन्न औषध प्रशासन विभागाच्या चमूने सातिवली माता व बाल संगोपन केंद्रात धाव घेतली.


महानगरपालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या प्रणिक इंटरप्राईजेसच्या अनिश शेख यांच्यासह इतर पुरवठादारांविरुद्ध वालीव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संबंधित औषध निर्माण करणारी कॅबिज ही मीरा रोड येथील कंपनी अस्तित्वातच नसून, या कंपनीचा संचालक विजय चौधरी हा सुद्धा बनावट औषधांच्या एका प्रकरणात नागपूर कारागृहात आहे. असे असतानाही कॅबिज कंपनीच्या नावाने शासकीय रुग्णालयांना औषधे विकली जात आहेत, याचा तपास आता नागपूर पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या