कंपनी अस्तित्वात नाही, संचालकही तुरुंगात!

  55

औषध निर्मितीचा धंदा मात्र जोरात


गणेश पाटील


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या सातिवली महिला व बालसंगोपन केंद्रात आढळलेले बनावट औषध तयार करणारी कंपनी अस्तित्वातच नसून, कंपनीचा संचालकही नागपूर तुरुंगात आहे. तरीसुद्धा औषध निर्मिती केली जात असून, शासकीय रुग्णालयांना पुरवठा देखील होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संपूर्ण राज्यात तपासणी करण्यात येत आहे.


दरम्यान, शासकीय रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणारी अनेक औषधे बनावट स्वरूपाची असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या औषधांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविली.


या मोहिमेत वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सातिवली येथील माता व बालसंगोपन केंद्रातून नेण्यात आलेले Tab. cefixime ip २०० mg. हे औषध बनावट असल्याचे मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेने स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित औषध रुग्णांना देण्यात येऊ नयेत त्यासोबतच या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालघर अन्न औषध प्रशासन विभागाच्या चमूने सातिवली माता व बाल संगोपन केंद्रात धाव घेतली.


महानगरपालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या प्रणिक इंटरप्राईजेसच्या अनिश शेख यांच्यासह इतर पुरवठादारांविरुद्ध वालीव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संबंधित औषध निर्माण करणारी कॅबिज ही मीरा रोड येथील कंपनी अस्तित्वातच नसून, या कंपनीचा संचालक विजय चौधरी हा सुद्धा बनावट औषधांच्या एका प्रकरणात नागपूर कारागृहात आहे. असे असतानाही कॅबिज कंपनीच्या नावाने शासकीय रुग्णालयांना औषधे विकली जात आहेत, याचा तपास आता नागपूर पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

लिपी आधी मरते, मग भाषा: दीपक पवार

वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं

वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा