कंपनी अस्तित्वात नाही, संचालकही तुरुंगात!

औषध निर्मितीचा धंदा मात्र जोरात


गणेश पाटील


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या सातिवली महिला व बालसंगोपन केंद्रात आढळलेले बनावट औषध तयार करणारी कंपनी अस्तित्वातच नसून, कंपनीचा संचालकही नागपूर तुरुंगात आहे. तरीसुद्धा औषध निर्मिती केली जात असून, शासकीय रुग्णालयांना पुरवठा देखील होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संपूर्ण राज्यात तपासणी करण्यात येत आहे.


दरम्यान, शासकीय रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणारी अनेक औषधे बनावट स्वरूपाची असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या औषधांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविली.


या मोहिमेत वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सातिवली येथील माता व बालसंगोपन केंद्रातून नेण्यात आलेले Tab. cefixime ip २०० mg. हे औषध बनावट असल्याचे मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेने स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित औषध रुग्णांना देण्यात येऊ नयेत त्यासोबतच या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालघर अन्न औषध प्रशासन विभागाच्या चमूने सातिवली माता व बाल संगोपन केंद्रात धाव घेतली.


महानगरपालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या प्रणिक इंटरप्राईजेसच्या अनिश शेख यांच्यासह इतर पुरवठादारांविरुद्ध वालीव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संबंधित औषध निर्माण करणारी कॅबिज ही मीरा रोड येथील कंपनी अस्तित्वातच नसून, या कंपनीचा संचालक विजय चौधरी हा सुद्धा बनावट औषधांच्या एका प्रकरणात नागपूर कारागृहात आहे. असे असतानाही कॅबिज कंपनीच्या नावाने शासकीय रुग्णालयांना औषधे विकली जात आहेत, याचा तपास आता नागपूर पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता