आधुनिक मत्स्यपालनावर विशेष कार्यशाळा

पालघर : पालघर जिल्ह्यातील मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून सक्षम करण्यासाठी कोसबाड कृषी विज्ञान केंद्र आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यपालनविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


राष्ट्रीय मत्स्य किसान दिनाचे औचित्य साधून १० जुलै रोजी आधुनिक मत्स्यपालन या विषयावर ही महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत करण्यात आले आहे. इच्छुक मत्स्यपालक, नवीन उद्योजक, तरुण-तरुणी आणि शेतकरी यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


या एकदिवसीय कार्यशाळेत सहभागींना मत्स्यपालनाशी संबंधित विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन मिळेल. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. आपली जागा निश्चित करण्यासाठी <https://forms.gle/4myYcQii4TaQ955D> या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. हा उपक्रम जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देईल आणि स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे नवे द्वार उघडेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Vasai Fort : 'मला मराठी येत नाही!' म्हणत वसई किल्ल्यावर सुरक्षा रक्षकाचा माज; शिवरायांच्या वेशातील युवकाला फोटो काढण्यास मज्जाव!

पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या (Deepotsav) शुभदिनी एक अनपेक्षित आणि वादग्रस्त घटना

विरारमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; मोठे आर्थिक नुकसान

विरार: विरार पूर्वेकडील आरजे सिग्नलजवळ असलेल्या एका फर्निचरच्या मोठ्या दुकानाला २१ ऑक्टोबरच्या दुपारी भीषण आग

रिचा पाटीलच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट विरार : विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी