कबुतरखाना बंद करण्यासाठी महापालिका अ‍ॅक्शन मोडवर, दाणे टाकणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य सरकारने मुंबईतील ५१ कबुतर खान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर सोमवारी जीपीओ समोरील पाणपाईच्या जागेत निर्माण झालेल्या कबुतर खान्यामध्ये कबुतरांना खाण्यास दाणे टाकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतली. कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला असून ही कारवाई देहाच्या स्वरुपात्त पैसे गोळा करण्यासाठी नसून नागरिकांमध्ये भीती निर्माण व्हावो याच दृष्टिकोनातून केल्याचे बोलले जात आहे. मात्र, एकीकडे महापालिकेच्या ए विभागाच्यावतीने ही कारवाई केली जात असतानाच दादर कबुतर खान्यामध्ये चक्क कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने याठिकाणचा कबुतरखाना बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही दिसून येत नाही. दरम्यान, उपद्रवशोधकांची पदे रिक्त असल्याने यावर कारवाई कुणी करायची हा मोठा प्रश्न आता महापालिकेपुढे आहे.


कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यास घातक असल्याने मुंबईतील कबुतरांना खाणे देणारी ठिकाण बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. मुंबई आणि कबूतर यांची एक वेगळी ओळख आहे आणि मुंबईतील अनेक भागांमध्ये कबुतर खाने आहे. मुंबईत अशाप्रकारे ५१ कबुतर खाने असून सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर तसेच निर्देशानुसार शुक्रवारी महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादर कबुतरखान्यावरील छप्पर आणि तेथील साहित्य जप्त केले आणि या कबुतर खान्याची स्वच्छता केली. शुक्रवारी या कचुतर खान्याची स्वच्छता केल्यानंतर शनिवार पासून पुन्हा एकदा पक्षीप्रेमी तथा कबुतर प्रेमी हे भूतदयेपोटी तसेच पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी टाकण्यासाठी दाणे टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे याठिकाणी पुन्हा कबुतर खान्यातील कबुतरांचा बाबर सुरु झाला आहे.


एका बाजुला दादरमधील कबुतर खाना बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाली सुरु नसतानाच दुसरीकडे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्यासमोरील पाणपोईच्या ठिकाणी असलेल्या कबुतरखान्याच्या जागी कबुतरांना दाणे खायला घालण्याविरोधात धडक कारवाई हाती घेतली. या कबुतर खान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य खायला देणान्यांना पाचशे रुपांचा दंड आकारला आहे. याठिकाणी सकाळी बबलू वर्मा यांना दाणे खायला घातल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच प्रत्येक व्यक्तीला दाणे न टाकण्याचे आवाहन केले. त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी चा कबुतरखान्यात दाणे खायला घालू नये असे आवाहनच महापालिकेच्यावतीने केले आहे. दरम्यान, जैन तसेच गुजराती धर्मिय तसेच त्यांच्या संस्थांकडून महापालिकेला निवेदन प्राप्त होत असून या कबुतर खान्पांवर कारवाई न करण्याची विनंती केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेने हा निर्णय घेतला असला तरी संस्थांच्या विनंतीनंतर महापालिका काय निर्णय घेते याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :