'अखेर सरकारने मोर्चाला परवानगी दिली'

मुंबई : मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मनसे मोर्चा काढत आहे. या मोर्चाला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम होते. हे बघून घाबरून पोलिसांनी मोर्चाला परवनगी दिली, असे मनसेचे अभिजीत पानसे यांनी सांगितले.

आधी व्यापाऱ्यांचा मोर्चा, आता मनसेचा मोर्चा

ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे व्यवस्थित मराठी बोलू न शकणाऱ्या काही व्यापाऱ्यांना मारहाण झाली. या घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांना मोर्चा काढला. नंतर मनसेने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली. पण या मोर्चासाठी गर्दीच्या भागातील मार्गाची मागणी केली. गर्दीच्या वेळेत मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली तर नागरिकांची गैरसोय होईल त्यामुळे दुसरा एखादा मार्ग सांगा अशी तोंडी विनंती पोलिसांनी केली. पण मनसेचे पदाधिकारी मोर्चा मार्गावर अडून बसले.अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. पोलिसांचा निर्णय आला आणि मीरा भाईंदरमध्ये तणाव वाढण्यास सुरुवात झाली.

आधी पोलीस कारवाई, नंतर मोर्चाला परवानगी

मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मनसेच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मनसेशी संबंधित असलेल्या अनेकांना नोटीस बजावण्यात आली. मीरा भाईंदर तसेच वसई विरारमध्ये मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांनी स्थानिक पोलिसांशी चर्चा करुन नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल असा मार्ग मोर्चा काढण्यासाठी निवडावा. जर तोडगा निघाला तर मोर्चासाठी लगेच परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आहे, असे मनसेचे अभिजीत पानसे यांनी सांगितले.

मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मनसे मोर्चा काढत आहे. या मोर्चाला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम होते. हे बघून घाबरून पोलिसांनी मोर्चाला परवनगी दिली, असेही मनसेचे अभिजीत पानसे म्हणाले.
Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा