'अखेर सरकारने मोर्चाला परवानगी दिली'

मुंबई : मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मनसे मोर्चा काढत आहे. या मोर्चाला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम होते. हे बघून घाबरून पोलिसांनी मोर्चाला परवनगी दिली, असे मनसेचे अभिजीत पानसे यांनी सांगितले.

आधी व्यापाऱ्यांचा मोर्चा, आता मनसेचा मोर्चा

ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे व्यवस्थित मराठी बोलू न शकणाऱ्या काही व्यापाऱ्यांना मारहाण झाली. या घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांना मोर्चा काढला. नंतर मनसेने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली. पण या मोर्चासाठी गर्दीच्या भागातील मार्गाची मागणी केली. गर्दीच्या वेळेत मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली तर नागरिकांची गैरसोय होईल त्यामुळे दुसरा एखादा मार्ग सांगा अशी तोंडी विनंती पोलिसांनी केली. पण मनसेचे पदाधिकारी मोर्चा मार्गावर अडून बसले.अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. पोलिसांचा निर्णय आला आणि मीरा भाईंदरमध्ये तणाव वाढण्यास सुरुवात झाली.

आधी पोलीस कारवाई, नंतर मोर्चाला परवानगी

मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मनसेच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मनसेशी संबंधित असलेल्या अनेकांना नोटीस बजावण्यात आली. मीरा भाईंदर तसेच वसई विरारमध्ये मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांनी स्थानिक पोलिसांशी चर्चा करुन नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल असा मार्ग मोर्चा काढण्यासाठी निवडावा. जर तोडगा निघाला तर मोर्चासाठी लगेच परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आहे, असे मनसेचे अभिजीत पानसे यांनी सांगितले.

मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मनसे मोर्चा काढत आहे. या मोर्चाला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम होते. हे बघून घाबरून पोलिसांनी मोर्चाला परवनगी दिली, असेही मनसेचे अभिजीत पानसे म्हणाले.
Comments
Add Comment

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी