11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला


मुंबई: राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर  या कॅप राउंड १ मध्ये राज्यातील एकूण ९ हजार ४६९ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० इतक्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यानुसार पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याची अंतिम मुदत सोमवारी, दि.७ जुलैला संपुष्टात आली.  या फेरीमध्ये विविध महाविद्यालयांनी निरनिराळ्या कारणास्तव ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहेत.


शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीनंतर ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कोट्यांतर्गत ७५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर नियमित फेरीअंतर्गत ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र राज्यातील महाविद्यालयांनी विविध कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले असल्याची बातमी समोर येत आहे.



प्रवेश नाकारण्याचे कारण


ज्या विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये चुकीची माहिती भरली, जसे की जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र आदी सादर केली नाहीत, तसेच अर्जामध्ये चुकीचे गुण भरल्यामुळे त्यांना कनिष्ठ महाविद्यालयानी प्रवेश नाकारले आहेत.


ज्यामध्ये कोट्यांतर्गत प्रवेशासाठी प्रयत्न केलेल्या २ हजार १९३ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश नाकारले आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे २ हजार ४९५, तसेच वाणिज्य शाखेसाठी ९५६ आणि कला शाखेसाठी ७५८ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत. योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी दिली. तसेच पहिल्या फेरीत प्रवेश नाकारण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार असल्याचे देखील त्यांनी पुढे सांगितले. तर अधिक चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्वाधिक ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. त्याखालोखाल कला शाखेत प्रवेश घेतलेल्या ४३१ आणि वाणिज्य शाखेतील ३६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या ३६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत.



अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये किती जागा उपलब्ध?


अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये ९ हजार ४६९ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० इतक्या जागा उपलब्ध आहेत. यातील १६ लाख ७० हजार ५९८ नियमित फेऱ्यांसाठी, तर ४ लाख ५३ हजार १२२ जागा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी राखीव आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश पहिल्या फेरीत झालेला नाही, त्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी दुसऱ्या फेरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 

 

 
Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर