खाजगी, अनधिकृत शालेय वाहतूक टाळा: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पालकांना आवाहन

ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. ७ जुलै २०२५ रोजी कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर घडलेल्या एका गंभीर अपघातानंतर हे आवाहन करण्यात आले आहे.


या अपघातात अंबरनाथ येथील फातिमा हायस्कूलमधील शिशु वर्गातील तीन विद्यार्थी एका भरधाव व्हॅनमधून (MH05FB4792) मागील दरवाजा उघडल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले. व्हॅन चालकाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला. याप्रकरणी, अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार व्हॅनवर दंडात्मक कारवाई करत ती जप्त करण्यात आली आहे.


या घटनेच्या पार्श्वभूमीवर, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकृत आणि शालेय परवाना असलेल्या वाहनांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

'आई कुठे काय करते' फेम 'ही' अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; जाणून घ्या तिच्या पार्टनरबद्दल

आई कुठे काय करते या मालिकेत ईशा हे पात्र रंगवणारी फेमस अभिनेत्री अपूर्वा गोरे ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार, मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत पुनीत इस्सर दिसणार

मुंबई: ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव

Sankashti Chaturthi Feb 2026: माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी 5 फ्रेब्रुवारीला, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या