खाजगी, अनधिकृत शालेय वाहतूक टाळा: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पालकांना आवाहन

ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. ७ जुलै २०२५ रोजी कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर घडलेल्या एका गंभीर अपघातानंतर हे आवाहन करण्यात आले आहे.


या अपघातात अंबरनाथ येथील फातिमा हायस्कूलमधील शिशु वर्गातील तीन विद्यार्थी एका भरधाव व्हॅनमधून (MH05FB4792) मागील दरवाजा उघडल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले. व्हॅन चालकाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला. याप्रकरणी, अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार व्हॅनवर दंडात्मक कारवाई करत ती जप्त करण्यात आली आहे.


या घटनेच्या पार्श्वभूमीवर, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकृत आणि शालेय परवाना असलेल्या वाहनांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर