नागपूरमध्ये दुर्दैवी घटना: शाळेत मुलाला सोडायला जाताना झाड पडून वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील तिरोडा येथे आज सकाळी एका हृदयद्रावक घटनेत शाळेत मुलाला सोडायला निघालेल्या वडिलांचा झाड पडून जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून बिसेन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील सतोना बोपेसर मार्गावर ही घटना घडली. जीवचंद यादोराव बिसेन (वय ४६) हे आज सकाळी आपल्या मुलाला चिराग जीवचंद बिसेन (वय १६) याला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून (क्रमांक MH 35 AP 9370) निघाले होते. तिरोडाकडे जात असताना, सतोना बोपेसर गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडावर अचानक वीज कोसळली आणि ते झाड थेट रस्त्यावर पडले.

झाड कोसळले त्यावेळी जीवचंद बिसेन यांची दुचाकी नेमकी त्याच्याखालीच होती. काही कळायच्या आतच जीवचंद आणि चिराग यांच्या अंगावर झाड कोसळले. झाडाखाली दबल्याने जीवचंद बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला. चिराग बिसेन गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चिरागला झाडाखालून बाहेर काढले.

चिरागला तातडीने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून तिरोड्यात पावसाने हजेरी लावली होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे