नागपूरमध्ये दुर्दैवी घटना: शाळेत मुलाला सोडायला जाताना झाड पडून वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील तिरोडा येथे आज सकाळी एका हृदयद्रावक घटनेत शाळेत मुलाला सोडायला निघालेल्या वडिलांचा झाड पडून जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून बिसेन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील सतोना बोपेसर मार्गावर ही घटना घडली. जीवचंद यादोराव बिसेन (वय ४६) हे आज सकाळी आपल्या मुलाला चिराग जीवचंद बिसेन (वय १६) याला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून (क्रमांक MH 35 AP 9370) निघाले होते. तिरोडाकडे जात असताना, सतोना बोपेसर गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडावर अचानक वीज कोसळली आणि ते झाड थेट रस्त्यावर पडले.

झाड कोसळले त्यावेळी जीवचंद बिसेन यांची दुचाकी नेमकी त्याच्याखालीच होती. काही कळायच्या आतच जीवचंद आणि चिराग यांच्या अंगावर झाड कोसळले. झाडाखाली दबल्याने जीवचंद बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला. चिराग बिसेन गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चिरागला झाडाखालून बाहेर काढले.

चिरागला तातडीने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सकाळपासून तिरोड्यात पावसाने हजेरी लावली होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी