कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे, ज्यामुळे २५० कोटींच्या करारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी शुभमन गिलचा एक फोटो समोर आला असून या फोटोमध्ये गिलने नाइकी ब्रँडचे किट परिधान केलेला दिसला, जेव्हा बीसीसीआयचा अधिकृत किट प्रायोजक सध्या अ‍ॅडिडास आहे. यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.


एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय डाव घोषित करताना शुबमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत गिल नाइकीचे काळ्या रंगाचे किट परिधान केलेला दिसला, जेव्हा बीसीसीआयचा अधिकृत किट प्रायोजक सध्या अ‍ॅडिडास आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. लोक आता प्रश्न विचारत आहेत की, असे करणे कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचे? बीसीसीआयचा किट प्रायोजक अ‍ॅडिडास असताना कर्णधार शुबमन गिलने उघडपणे नाइकीची बनियान घातल्याने अ‍ॅडिडास प्रश्न उपस्थित करू शकते. जर त्यांनी इच्छा दर्शवली, तर बीसीसीआय विरुद्ध नोटीस बजावली जाऊ शकते किंवा कायदेशीर कारवाईसाठी ते कोर्टातही जाऊ शकतात. या प्रकरणात पुढे काय घडते, हे पाहणे महत्तवाचे ठरेल.


२०२३ मध्ये बीसीसीआयने अ‍ॅडिडाससोबत ५ वर्षांचा (२०२८ पर्यंत) करार केला होता, ज्याची किंमत २५० कोटींहून अधिक आहे. यापूर्वी नाइकी हेच भारतीय संघाचे किट प्रायोजक होते, पण त्यांचा करार २०२० मध्ये संपला. त्यानंतर बायजूस आणि एमपीएल यांसारखे प्रायोजक बीसीसीआयशी जोडले गेले. २०२३ मध्ये अ‍ॅडिडाससोबत हा मोठा करार झाला, जो सध्या कायम आहे.


तर शुबमन गिल हा नाइकीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे, त्यामुळे त्याच्याकडे नाइकीची बनियान असणे स्वाभाविक आहे. एक मत असेही आहे की, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या खेळाडूकडून अशी चूक झाल्यास त्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. यामुळे या प्रकरणात गिलपेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जबाबदार ठरेल.

Comments
Add Comment

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट