कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

  20

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे, ज्यामुळे २५० कोटींच्या करारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी शुभमन गिलचा एक फोटो समोर आला असून या फोटोमध्ये गिलने नाइकी ब्रँडचे किट परिधान केलेला दिसला, जेव्हा बीसीसीआयचा अधिकृत किट प्रायोजक सध्या अ‍ॅडिडास आहे. यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.


एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय डाव घोषित करताना शुबमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत गिल नाइकीचे काळ्या रंगाचे किट परिधान केलेला दिसला, जेव्हा बीसीसीआयचा अधिकृत किट प्रायोजक सध्या अ‍ॅडिडास आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. लोक आता प्रश्न विचारत आहेत की, असे करणे कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचे? बीसीसीआयचा किट प्रायोजक अ‍ॅडिडास असताना कर्णधार शुबमन गिलने उघडपणे नाइकीची बनियान घातल्याने अ‍ॅडिडास प्रश्न उपस्थित करू शकते. जर त्यांनी इच्छा दर्शवली, तर बीसीसीआय विरुद्ध नोटीस बजावली जाऊ शकते किंवा कायदेशीर कारवाईसाठी ते कोर्टातही जाऊ शकतात. या प्रकरणात पुढे काय घडते, हे पाहणे महत्तवाचे ठरेल.


२०२३ मध्ये बीसीसीआयने अ‍ॅडिडाससोबत ५ वर्षांचा (२०२८ पर्यंत) करार केला होता, ज्याची किंमत २५० कोटींहून अधिक आहे. यापूर्वी नाइकी हेच भारतीय संघाचे किट प्रायोजक होते, पण त्यांचा करार २०२० मध्ये संपला. त्यानंतर बायजूस आणि एमपीएल यांसारखे प्रायोजक बीसीसीआयशी जोडले गेले. २०२३ मध्ये अ‍ॅडिडाससोबत हा मोठा करार झाला, जो सध्या कायम आहे.


तर शुबमन गिल हा नाइकीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे, त्यामुळे त्याच्याकडे नाइकीची बनियान असणे स्वाभाविक आहे. एक मत असेही आहे की, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या खेळाडूकडून अशी चूक झाल्यास त्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. यामुळे या प्रकरणात गिलपेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जबाबदार ठरेल.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे

बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ? भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन

N C Classic: नीरज चोप्राने एनसी क्लासिक स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक, घरच्या मैदानावर दमदार कामगिरी

बेंगळुरू: शनिवारी बेंगळुरूमधील श्री कांतीरवा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत