'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान हादरला! भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनकडून खरेदी करणार KJ500 रडार

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक तयारीने आणि वेगाने वाढणाऱ्या लष्करी क्षमतेने, स्तब्ध झालेला पाकिस्तान आता चीनकडून आधुनिक केजे-५०० एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AEW&C) खरेदी करण्याची योजना आखत आहे.

भारताच्या यशस्वी 'ऑपरेशन सिंदूर'चा पाकिस्तानने जबरदस्त धसका घेतला आहे.  या ऑपरेशनने भारताची स्ट्राइक क्षमता आणि त्याची तयारी संपूर्ण जगाला दाखवून दिली. यामुळे आपले हवाई सामर्थ्य वाढवण्यासाठी पाकिस्तान मित्र देशाकडून सहकार्य मागत सुटला आहे. ज्यामध्ये चीनचा देखील समावेश आहे. 

चीनकडून लष्करी सहकार्याची मागणी


पाकिस्तान आता आपले हवाई दल मजबूत करण्यासाठी चीनकडून मदत घेऊ  पाहत आहे. त्याने चीनकडून  आधुनिक रडार सिस्टीम केजे-५०० खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्याद्वारे भारताकडे नजर ठेवणे त्यानं शक्य होईल. 

केजे-५०० म्हणजे काय?


केजे-५०० ही एक एईडब्ल्यू अँड सी म्हणजेच एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे, जी हवाई देखरेख आणि नियंत्रणासाठी वापरली जाते. ती शत्रूच्या हालचाली आगाऊ शोधू शकते. ४७० किमी पर्यंत पाळत ठेवण्याची क्षमता केजे-५०० हे सुमारे ४७० किमी पर्यंत शत्रूच्या लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. यामुळे पाकिस्तानला आकाशावर चांगले नियंत्रण मिळेल. एकाच वेळी ६० लक्ष्यांचा मागोवा घेण्याची शक्ती ही रडार प्रणाली एकाच वेळी ६० हून अधिक लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि रिअल टाइममध्ये लढाऊ विमानांना कमांड देऊ शकते.

चीन आधीपासून या रडारचा वापर करत आहे


चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) आधीच या रडार प्रणालीचा वापर करत आहे, विशेषतः तैवान आणि दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात याचा वापर केला जात आहे. 

भारतासाठी ही चिंतेची बाब का आहे?


केजे-५०० पाकिस्तानला हवाई क्षेत्रात आघाडी देऊ शकते, ज्यामुळे भारतीय हवाई संरक्षण अधिक सतर्क राहावे लागेल. त्याची तैनाती संवेदनशील असेल, विशेषतः सीमावर्ती भागात. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अजूनही असहाय्य आहे. अर  केजे-५०० ची किंमत लाखो डॉलर्सची आहे.

पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि कर्जाचा वाढत चाललेला बोजवारा असूनही, पाकड्या आपल्या संरक्षण सौद्यांवर मोठा खर्च करत आहे.
Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.