'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान हादरला! भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनकडून खरेदी करणार KJ500 रडार

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक तयारीने आणि वेगाने वाढणाऱ्या लष्करी क्षमतेने, स्तब्ध झालेला पाकिस्तान आता चीनकडून आधुनिक केजे-५०० एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AEW&C) खरेदी करण्याची योजना आखत आहे.

भारताच्या यशस्वी 'ऑपरेशन सिंदूर'चा पाकिस्तानने जबरदस्त धसका घेतला आहे.  या ऑपरेशनने भारताची स्ट्राइक क्षमता आणि त्याची तयारी संपूर्ण जगाला दाखवून दिली. यामुळे आपले हवाई सामर्थ्य वाढवण्यासाठी पाकिस्तान मित्र देशाकडून सहकार्य मागत सुटला आहे. ज्यामध्ये चीनचा देखील समावेश आहे. 

चीनकडून लष्करी सहकार्याची मागणी


पाकिस्तान आता आपले हवाई दल मजबूत करण्यासाठी चीनकडून मदत घेऊ  पाहत आहे. त्याने चीनकडून  आधुनिक रडार सिस्टीम केजे-५०० खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्याद्वारे भारताकडे नजर ठेवणे त्यानं शक्य होईल. 

केजे-५०० म्हणजे काय?


केजे-५०० ही एक एईडब्ल्यू अँड सी म्हणजेच एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम आहे, जी हवाई देखरेख आणि नियंत्रणासाठी वापरली जाते. ती शत्रूच्या हालचाली आगाऊ शोधू शकते. ४७० किमी पर्यंत पाळत ठेवण्याची क्षमता केजे-५०० हे सुमारे ४७० किमी पर्यंत शत्रूच्या लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. यामुळे पाकिस्तानला आकाशावर चांगले नियंत्रण मिळेल. एकाच वेळी ६० लक्ष्यांचा मागोवा घेण्याची शक्ती ही रडार प्रणाली एकाच वेळी ६० हून अधिक लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि रिअल टाइममध्ये लढाऊ विमानांना कमांड देऊ शकते.

चीन आधीपासून या रडारचा वापर करत आहे


चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (पीएलएएएफ) आधीच या रडार प्रणालीचा वापर करत आहे, विशेषतः तैवान आणि दक्षिण चीन समुद्र क्षेत्रात याचा वापर केला जात आहे. 

भारतासाठी ही चिंतेची बाब का आहे?


केजे-५०० पाकिस्तानला हवाई क्षेत्रात आघाडी देऊ शकते, ज्यामुळे भारतीय हवाई संरक्षण अधिक सतर्क राहावे लागेल. त्याची तैनाती संवेदनशील असेल, विशेषतः सीमावर्ती भागात. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अजूनही असहाय्य आहे. अर  केजे-५०० ची किंमत लाखो डॉलर्सची आहे.

पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि कर्जाचा वाढत चाललेला बोजवारा असूनही, पाकड्या आपल्या संरक्षण सौद्यांवर मोठा खर्च करत आहे.
Comments
Add Comment

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये हवाई दलाच्या AN-३२ विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ५ जवान शहीद, सहवैमानिक गंभीर जखमी

आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू

Defence Minister Rajnath Singh : “पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही”; सिंधू जल करारावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कडक इशारा

हैदराबाद : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या

Indore Bus Accident : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोठा धक्का; भाचा प्रभात सिंह यांचा भीषण अपघातात मृत्यू

Indore Bus Accident : इंदौर : केंद्रीय संरक्षणमंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह  (Rajnath Singh) यांचे भाचे प्रभात सिंह (Prabhat Singh) यांचा मध्य

ED Raid On TMC MLA Madan Mitra House : टीएमसी आमदार मदन मित्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नगरपालिका भरतीतील कथित अनियमिततेच्या तपासासंदर्भात ईडीने एक मोठी शोधमोहीम सुरू

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये मोठी दुर्घटना! भारतीय वायुदलाचे AN-32 ट्रान्सपोर्ट विमान कोसळले, जोरहाट एअरबेसवर आग

आसाम : आसाममधील जोरहाट येथे शनिवारी सकाळी भारतीय वायुदलाच्या (IAF) AN-32 ट्रान्सपोर्ट विमानाचा भीषण अपघात (Indian Air Force AN-32 Plane

Crime News : MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; तेलंगणातील महाठगाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत देशभरातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची