बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ?


भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. दुसरी कसोटी कोण जिंकणार हे पाचव्या दिवसाच्या खेळावर अवलंबून आहे. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनच्या मैदानावर दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीत शेवटच्या दिवशी ५३६ धावा करण्याचे आव्हान इंग्लंडपुढे आहे. इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. बाकीचे फलंदाज मिळून ही कामगिरी पार पाडू शकले तर इंग्लंड मालिकेत २ - ० अशी आघाडी घेईल. सामना भारताने जिंकला तर १ - १ अशी बरोबरी होईल आणि तिसऱ्या कसोटीची चुरस वाढेल. सामना अनिर्णित राहिला तर इंग्लंडची १ - ० ही आघाडी कायम राहील. निर्णायक डावात इंग्लंडचा झॅक क्रॉली शून्यावर, बेन डकेट २५ धावांवर आणि जो रूट सहा धावांवर बाद झाला आहे.



चौथ्या दिवसअखेर धावफलक
भारत 587 आणि 427/6 डाव घोषित
इंग्लंड 407 आणि 72/3 (16)
Comments
Add Comment

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन