बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ?


भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. दुसरी कसोटी कोण जिंकणार हे पाचव्या दिवसाच्या खेळावर अवलंबून आहे. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनच्या मैदानावर दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीत शेवटच्या दिवशी ५३६ धावा करण्याचे आव्हान इंग्लंडपुढे आहे. इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. बाकीचे फलंदाज मिळून ही कामगिरी पार पाडू शकले तर इंग्लंड मालिकेत २ - ० अशी आघाडी घेईल. सामना भारताने जिंकला तर १ - १ अशी बरोबरी होईल आणि तिसऱ्या कसोटीची चुरस वाढेल. सामना अनिर्णित राहिला तर इंग्लंडची १ - ० ही आघाडी कायम राहील. निर्णायक डावात इंग्लंडचा झॅक क्रॉली शून्यावर, बेन डकेट २५ धावांवर आणि जो रूट सहा धावांवर बाद झाला आहे.



चौथ्या दिवसअखेर धावफलक
भारत 587 आणि 427/6 डाव घोषित
इंग्लंड 407 आणि 72/3 (16)
Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या