बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ?


भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. दुसरी कसोटी कोण जिंकणार हे पाचव्या दिवसाच्या खेळावर अवलंबून आहे. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनच्या मैदानावर दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीत शेवटच्या दिवशी ५३६ धावा करण्याचे आव्हान इंग्लंडपुढे आहे. इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. बाकीचे फलंदाज मिळून ही कामगिरी पार पाडू शकले तर इंग्लंड मालिकेत २ - ० अशी आघाडी घेईल. सामना भारताने जिंकला तर १ - १ अशी बरोबरी होईल आणि तिसऱ्या कसोटीची चुरस वाढेल. सामना अनिर्णित राहिला तर इंग्लंडची १ - ० ही आघाडी कायम राहील. निर्णायक डावात इंग्लंडचा झॅक क्रॉली शून्यावर, बेन डकेट २५ धावांवर आणि जो रूट सहा धावांवर बाद झाला आहे.



चौथ्या दिवसअखेर धावफलक
भारत 587 आणि 427/6 डाव घोषित
इंग्लंड 407 आणि 72/3 (16)
Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला