बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ?


भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. दुसरी कसोटी कोण जिंकणार हे पाचव्या दिवसाच्या खेळावर अवलंबून आहे. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनच्या मैदानावर दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीत शेवटच्या दिवशी ५३६ धावा करण्याचे आव्हान इंग्लंडपुढे आहे. इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. बाकीचे फलंदाज मिळून ही कामगिरी पार पाडू शकले तर इंग्लंड मालिकेत २ - ० अशी आघाडी घेईल. सामना भारताने जिंकला तर १ - १ अशी बरोबरी होईल आणि तिसऱ्या कसोटीची चुरस वाढेल. सामना अनिर्णित राहिला तर इंग्लंडची १ - ० ही आघाडी कायम राहील. निर्णायक डावात इंग्लंडचा झॅक क्रॉली शून्यावर, बेन डकेट २५ धावांवर आणि जो रूट सहा धावांवर बाद झाला आहे.



चौथ्या दिवसअखेर धावफलक
भारत 587 आणि 427/6 डाव घोषित
इंग्लंड 407 आणि 72/3 (16)
Comments
Add Comment

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित