IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल ३३६ धावांनी जिंकला आहे. या सामन्यात विजय मिळवम्यासाठी इंग्लंडला ६०८ धावांचे आव्हान मिळाले होते. याचा पाठलाग करताना यजमान संघ पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सेशनमध्ये ऑलआऊट झाला.


भारताने पहिल्यांदा बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. याआधी ८ सामने खेळवले गेले होते. त्यापैकी ७ सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाने या मैदानावर पहिला कसोटी सामना जुलै १९६७ मध्ये खेळला होता. यात भारताला १३२ धावांनी पराभव मिळाला होता. आता भारताने ५९ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नसतानाही भारताने हा सामना जिंकला आहे.


भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत आपला दुसरा डाव ६ बाद ४२७ वर घोषित केला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावांत ५८७ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारावर भारताला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली होती.



कर्णधार म्हणून गिलचा पहिला विजय


कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने मिळवलेला हा पहिला विजय आहे. त्याने संपूर्ण कसोटीत दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने अडीचशेहून अधिक धावा केल्या. तर दुसऱ्या डावात दीडशेहून अधिक धावांची खेळी केली होती. याचा अर्थ भारताच्या या धावसंख्येमध्ये ४००हून अधिक धावा एकट्या गिलच्याच होत्या.


मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खराब राहिली. त्यांनी ५० धावांपर्यंत आपले तीन विकेट गमावले होते. जॅक क्राऊलीला मोहम्मद सिराजन बाद केले. तर बेन डकेट आणि जो रूटला आकाशदीपने बाद केले. यानंतर ओली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी चौथ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडला कोणतेही नुकसान होऊ दिले नाही.


पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यानंतर आकाशदीपने भारताला लवकर यश मिळवून दिले. आकाशने ओली पोपला बोल्ड केले. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर आकाशने हॅरी ब्रूकला बाद करत भारताला पाचवे यश मिळवून दिले. ब्रूक बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथने सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत इंग्लंडला सांभाळण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने लंचच्या आधी बेन स्टोक्सला बाद करत ही भागीदारी तोडली.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख