IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

  90

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल ३३६ धावांनी जिंकला आहे. या सामन्यात विजय मिळवम्यासाठी इंग्लंडला ६०८ धावांचे आव्हान मिळाले होते. याचा पाठलाग करताना यजमान संघ पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सेशनमध्ये ऑलआऊट झाला.


भारताने पहिल्यांदा बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. याआधी ८ सामने खेळवले गेले होते. त्यापैकी ७ सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाने या मैदानावर पहिला कसोटी सामना जुलै १९६७ मध्ये खेळला होता. यात भारताला १३२ धावांनी पराभव मिळाला होता. आता भारताने ५९ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नसतानाही भारताने हा सामना जिंकला आहे.


भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत आपला दुसरा डाव ६ बाद ४२७ वर घोषित केला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावांत ५८७ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारावर भारताला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली होती.



कर्णधार म्हणून गिलचा पहिला विजय


कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने मिळवलेला हा पहिला विजय आहे. त्याने संपूर्ण कसोटीत दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने अडीचशेहून अधिक धावा केल्या. तर दुसऱ्या डावात दीडशेहून अधिक धावांची खेळी केली होती. याचा अर्थ भारताच्या या धावसंख्येमध्ये ४००हून अधिक धावा एकट्या गिलच्याच होत्या.


मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खराब राहिली. त्यांनी ५० धावांपर्यंत आपले तीन विकेट गमावले होते. जॅक क्राऊलीला मोहम्मद सिराजन बाद केले. तर बेन डकेट आणि जो रूटला आकाशदीपने बाद केले. यानंतर ओली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी चौथ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडला कोणतेही नुकसान होऊ दिले नाही.


पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यानंतर आकाशदीपने भारताला लवकर यश मिळवून दिले. आकाशने ओली पोपला बोल्ड केले. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर आकाशने हॅरी ब्रूकला बाद करत भारताला पाचवे यश मिळवून दिले. ब्रूक बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथने सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत इंग्लंडला सांभाळण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने लंचच्या आधी बेन स्टोक्सला बाद करत ही भागीदारी तोडली.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता