IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

  80

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल ३३६ धावांनी जिंकला आहे. या सामन्यात विजय मिळवम्यासाठी इंग्लंडला ६०८ धावांचे आव्हान मिळाले होते. याचा पाठलाग करताना यजमान संघ पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सेशनमध्ये ऑलआऊट झाला.


भारताने पहिल्यांदा बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. याआधी ८ सामने खेळवले गेले होते. त्यापैकी ७ सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाने या मैदानावर पहिला कसोटी सामना जुलै १९६७ मध्ये खेळला होता. यात भारताला १३२ धावांनी पराभव मिळाला होता. आता भारताने ५९ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नसतानाही भारताने हा सामना जिंकला आहे.


भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत आपला दुसरा डाव ६ बाद ४२७ वर घोषित केला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावांत ५८७ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारावर भारताला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली होती.



कर्णधार म्हणून गिलचा पहिला विजय


कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने मिळवलेला हा पहिला विजय आहे. त्याने संपूर्ण कसोटीत दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने अडीचशेहून अधिक धावा केल्या. तर दुसऱ्या डावात दीडशेहून अधिक धावांची खेळी केली होती. याचा अर्थ भारताच्या या धावसंख्येमध्ये ४००हून अधिक धावा एकट्या गिलच्याच होत्या.


मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खराब राहिली. त्यांनी ५० धावांपर्यंत आपले तीन विकेट गमावले होते. जॅक क्राऊलीला मोहम्मद सिराजन बाद केले. तर बेन डकेट आणि जो रूटला आकाशदीपने बाद केले. यानंतर ओली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी चौथ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडला कोणतेही नुकसान होऊ दिले नाही.


पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यानंतर आकाशदीपने भारताला लवकर यश मिळवून दिले. आकाशने ओली पोपला बोल्ड केले. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर आकाशने हॅरी ब्रूकला बाद करत भारताला पाचवे यश मिळवून दिले. ब्रूक बाद झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथने सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत इंग्लंडला सांभाळण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने लंचच्या आधी बेन स्टोक्सला बाद करत ही भागीदारी तोडली.

Comments
Add Comment

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर