'बाळासाहेबांच्या काळातही ७० - ७४ आमदार निवडून यायचे'

लातूर : ठराविक प्रसारमाध्यमांकडून ठाकरे ब्रँडची चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात २८८ आमदार निवडून यायला हवे होते. पण तेव्हाही ७० - ७४ आमदार निवडून यायचे, असे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

सध्याच्या राजकारणात नेता जनतेशी किती जोडलेला आहे हे महत्त्वाचे आहे. जनतेची किती कामं करतो हे पण महत्त्वाचं आहे; असेही बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ विचार सोडून दिला. राज ठाकरे यांनीसुद्धा टाळीला टाळी द्यायला फार उशीर केला आहे. त्यामुळे आता या एकत्र येण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही ठोस परिणाम होईल, असं वाटत नाही; असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. शनिवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.
Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने