'बाळासाहेबांच्या काळातही ७० - ७४ आमदार निवडून यायचे'

लातूर : ठराविक प्रसारमाध्यमांकडून ठाकरे ब्रँडची चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात २८८ आमदार निवडून यायला हवे होते. पण तेव्हाही ७० - ७४ आमदार निवडून यायचे, असे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

सध्याच्या राजकारणात नेता जनतेशी किती जोडलेला आहे हे महत्त्वाचे आहे. जनतेची किती कामं करतो हे पण महत्त्वाचं आहे; असेही बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ विचार सोडून दिला. राज ठाकरे यांनीसुद्धा टाळीला टाळी द्यायला फार उशीर केला आहे. त्यामुळे आता या एकत्र येण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही ठोस परिणाम होईल, असं वाटत नाही; असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. शनिवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.
Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग