हे तांदूळ खा , फिटनेस जपा !

मुंबई : आपल्या देशात अनेक प्रकारचा तांदुळ पिकवतात . भारतीय आहारात भाताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, आधुनिक काळात केवळ पांढऱ्या भातावर अवलंबून राहण्याऐवजी पोषणमूल्यांनी समृद्ध इतर प्रकारांचा विचार करणे आवश्यक आहे. आज आपण अशाच आरोग्यदायी व पारंपरिक भातप्रकारांची माहिती घेणार आहोत, जे तुमच्या आहाराला अधिक समृद्ध करू शकतात. हे भातप्रकार आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि संपूर्ण पोषण मिळते.


पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो . तो जवळपास ७० ते ९० च्या आसपास असतो. यात पोषक तत्वेही कमी असतात आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. त्यामुळे पांढरा तांदुळ खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. लठ्ठपणा वाढल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. जे आधीपासून मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी तर पांढरा तांदुळ खाऊच नये असा सल्ला दिला जातो.



जाणून घ्या कोणते आहेत हे तांदळाचे प्रकार : 


ब्राउन राईस
या तांदळात फायबरचे प्रमाण जास्त आहे . वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि मधुमेहींसाठी विशेष फायदेशीर आहे .


सालाम राईस
दक्षिण भारतातील लांबट दाण्याचा भात. सौम्य चव आणि हलकं पचन यामुळे दररोजच्या आहारासाठी योग्य .


ब्लॅक राईस
काळसर रंगाचा हा भात अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रित करणे असे गुणधर्म यात आहेत .


रेड राईस
फायबरयुक्त, खनिजांमध्ये भरपूर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त. केरळ, कर्नाटकात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.


नवारा राईस
आयुर्वेदात याला औषधी मानले जाते. हा तांदूळ खाल्ल्याने पचन सुधारते , रोगप्रतिकारक शक्ती वाढते , विशेषतः रुग्ण व वृद्ध व्यक्तींना उपयुक्त.


काळा जीरा राईस
सुगंधी, लांबसर दाणे असलेला हा भात सौम्य चवीचा असतो. बासमतीसारखा दिसतो पण पचनास अधिक हलका आहे .


Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे